शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

पोकराची ग्रामस्तरीय समितीच वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST

ओमप्रकाश देवकर मेहकर : कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याकरिता तालुक्यातील काही गावांची निवड करण्यात आली ...

ओमप्रकाश देवकर

मेहकर : कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याकरिता तालुक्यातील काही गावांची निवड करण्यात आली आहे. वरूड या गावामध्ये ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र येथील समितीबाबत तक्रारी होत असल्याने सर्वसामान्य शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत़ कृषी विभागाने यावर उपाययाेजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़

निवड झालेल्या गावांतील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावांमधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्याच्या दृष्टीने गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठी तसेच प्रकल्पांतर्गत हाती घ्यावयाच्या कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी कृषी विभागास साहाय्य करण्याकरिता गावातील कृषी व ग्रामीण विकास क्षेत्राशी संबंधित असलेल्या १३ व्यक्तींचा ग्राम कृषी संजीवनी समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात येताे. वरूड येथे ही समिती २१ जुलै २०२१ रोजी स्थापन करण्यात आली आहे. या समितीबाबत सरपंच यांनी गावातील सर्व नागरिकांना याबाबत अवगत करून ऑनलाइन पद्धतीने एकूण १३ लोकांची निवड या समितीमध्ये केली आहे. या वेळेस या समितीवर कुणीही आक्षेप न घेतल्यामुळे ही समिती कायम करण्यात आली. मात्र वरूड येथील काही ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी या समितीवर आक्षेप घेत सदर समिती ही नियमबाह्य पद्धतीने स्थापन करण्यात आली आहे. ही समिती स्थापन करताना ग्रामसभा बोलावण्यात आली नाही. सामान्य जनतेमधून समितीतील उमेदवारांची निवड करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़

ग्रामसभा घेऊन समितीची निवड करा

वरूड हे गाव आदिवासी असून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक राहतात. त्यांच्याकडे स्वतःचा मोबाइल नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना ऑनलाइन पद्धतीची माहिती नाही. त्यामुळे सदर समिती ही कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ग्रामसभा घेऊनच निवडण्यात यावी. तोपर्यंत सदर समिती ही अधिकृत न समजता बेकायदेशीर समजण्यात यावी, अशी विविध कारणे देत ही समिती बरखास्त समजण्याची मागणी वरूड येथील ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पवार, ज्योती रवींद्र पवार, कलावती चव्हाण, दारासिंग राठोड, माणिक पवार, रमेश पवार प्रकाश पवार, सविता पवार, विजय पवार यांच्यासह इतर ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे केली आहे.

ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करताना सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले आहे. गावांमध्ये सर्वांना सांगून समितीची निवड करण्यात आली आहे. कोरोना असल्याने प्रत्यक्ष ग्रामसभा न बोलाविता ऑनलाइन पद्धतीने समिती स्थापन केली आहे. या वेळी सर्वं अधिकारी उपस्थित होते.

अतुल महादेव वानखेडे, सरपंच, वरूड

या समितीमध्ये योग्य व प्रगतशील लोकांची निवड न झाल्याने समिती बरखास्त करण्यात यावी, याकरिता वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे.

- तुकाराम पवार, ग्रामपंचायत सदस्य, वरूड

अनेक प्रकरणे प्रलंबित

वरूड हे गाव पोखरा अंतर्गत येत असल्याने या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या इतर योजनेतून योजनांचा लाभ मिळत नाही. येथे समितीच वादग्रस्त असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहत असल्याने या प्रकरणाचा तत्काळ निपटारा व्हावा, अशी मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहेत.