शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

शेती मशागतीत यंत्राचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:36 IST

धामणगाव धाडः चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना बैलजाेडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे, शेती मशागतीसाठी यंत्राचा वापर वाढल्याचे चित्र धामणगाव बढे ...

धामणगाव धाडः चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना बैलजाेडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे, शेती मशागतीसाठी यंत्राचा वापर वाढल्याचे चित्र धामणगाव बढे परिसरात आहे.

धामणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. नांगरणी, वखरणी, आदी कामे सुरू केली आहेत. कोरोना संकटाशी सामना करीत असतानाच शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरीराजा यंदा नव्या जोमाने पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला दिसत आहे. मागील पाच-सात वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक दुष्काळी संकटे येत आहेत. परंतु शेतकरीराजा अजूनही निसर्गाशी सामना करतो आहे. जमिनीचा पोत, जडणघडण सुधारण्यासाठी पूर्वमशागतीची कामे करताना दिसत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शेतकरी महिनाभर आपापल्या घरामध्येच होता. मात्र, शेतकरी वर्गाने घरीच राहून चालणार नाही. शासनानेही याकरिता कृषी क्षेत्राला काही नियम, अटी लागू करून शेतीची कामे व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत कामात व्यस्त आहे. शेतकरी शेतातील काडी कचरा, शेणखत, नांगरणी असली कामे करीत आहे. खरीप हंगाम लवकरच सुरू हाेणार आहे.

काेराेनाचा फटका

खरीप हंगामापूर्वीच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने कृषीविषयक दुकानांची वेळ वाढवून दिली आहे. मात्र, संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, तसेच खतेही महागल्याचे चित्र आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. दुसरीकडे भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक संकट काेसळले आहे.