शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

मेहनत शेतक-याची अन कमाई व्यापा-याची!

By admin | Updated: June 17, 2016 02:45 IST

भाजीपाल्याचे दर वाढले, मात्र त्याचा लाभ शेतक-यांना नाहीच.

नाना हिवराळे , मनोज पाटील / खामगाव,मलकापूरबाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले असताना, या भाववाढीचा शेतकर्‍यांना फायदा होत नसून, शेतकर्‍याचा भाजीपाला दुपटीने विक्री करून व्यापारीच मालामाल होत असल्याचे चित्र आहे. खामगाव येथील आठवडी बाजारात दररोज पहाटे ४ पासून भाजीपाला हर्रासीला सुरुवात होते. जिल्ह्यासोबतच अकोला जिल्ह्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. आठवडी बाजारात मध्यरात्री ३ पासूनच रेलचेल सुरू होते. बाजारात भाजीपाला विक्रीस आलेला असताना वांगी ३0 ते ४0 रुपये किलो, पालक २५ ते ३0 रुपये, चवळी शेंगा ५0 ते ५५ रुपये, ढेमसे २५ ते ३0 रुपये, घोळ भाजी २0 ते २५ रुपये, भेंडी ४0 ते ४५ रुपये, गवार ३0 ते ३५ रुपये, गोबी २५ ते ३0 रुपये, कोथिंबीर ४0 रुपये, चवळी भाजी २५ ते ३0 रुपये, भोपळा २५ ते ३0 रुपये किलो याप्रमाणे हर्रासीत भाव मिळतो. भाज्यांचे दर कडाडले असताना अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. खेड्यांमधून गाडी भाड्याने आणण्याचा खर्च जास्त लागतो. अशा स्थितीत बाजारात हमाली, मोजमाप व अडत वजा करून घ्यावी लागते. खामगावात अडत दर शेकडा १0 टक्के एवढय़ा प्रचंड दराने कपात कपात करून घेत असल्याचे दिसून आले. एक हजाराचा भाजीपाला विक्री केल्यास १00 रूपये अडत कपात होत असताना शेतकर्‍यांना हा फटका मोठा वाटतो. दुष्काळाच्या स्थितीत कमी पावसात भाजीपाला पिकवताना लागणार्‍या कष्टाचे चीज होत नसल्याची त्यांची प्रतिक्रिया होती. हाच प्रकार मलकापूर उपबाजार समितीमध्ये दिसून येत आहे. शेतकर्‍यांचे मालाचे भाव व्यापारीच ठरवितात; मात्र भाव वाढवत असल्याचा देखावा उभा करतात. बोलीतून अधिक भाव देईल, त्याला माल दिला जातो. नंतर शेतकर्‍याला त्या मालाचे पैसे संबंधित अडते वजनानुसार देतात; परंतु काही अडते सदर पैसे देताना बाजार समिती नियमानुसार शेतकर्‍यांकडून मापाई व हमाली मिळून तीन टक्के अडत कापण्याऐवजी त्यांना हिशेबाच्या कच्चा चिठ्ठय़ा देऊन समोर शेकडा तीन टक्के अडत, तर त्याच चिठ्ठीच्या पाठीमागे शेकडा दहा टक्के अडत कापून उर्वरित पैसे शेतकर्‍याला देतात. असा लुटीचा गंभीर प्रकार नियमितच घडतो. त्यानंतर चिल्लर विक्रेते, व्यापारी आठवडी बाजारात तोच माल चढय़ा दराने विक्री करतात. ही बाब सकाळी ९ वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात निदर्शनास आली. शेतकरी मोठय़ा कष्टाने शेतातून भाजीपाला उत्पादित करतो, तोच खर्‍या अर्थी लुटल्या जातो. अडत्याशी असलेल्या संबंधाला शेतकरी भोळेपणातून जपतो. म्हणून तो राहतो उपाशी अन् अडते-व्यापारी व भाजीपाला विक्रेते मात्र तुपाशी; असा विरोधाभास हा कायमस्वरूपी आहे व पुढेही राहणार, एवढे खरे!