शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चार वर्षांंपासून बंद पडलेली नळयोजना अखेर सुरळीत!

By admin | Updated: January 7, 2016 02:19 IST

साखरखेर्डा येथे अखेर कोराडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुरळीत

अशोक इंगळे / सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): साखरखेर्डा गावाची पाणी समस्या दूर करणारी कोराडी प्रकल्पावरील नळयोजना तब्बल चार वर्षांपासून बंद होती. ती योजना स् थानिक ग्रामपंचायतीने अथक परिश्रम घेऊन अखेर सुरु केली. गावात नळाला पाणी येताच बुधवारी ग्रामस्थांच्या चेहर्‍यावरील आनंद द्विगुणीत झाला. साखरखेर्डा येथील हक्काचा महालक्ष्मी तलाव आटल्याने नळयोजना बंद झाली होती. गावा तील हातपंप, बोअरवेल बंद पडली, विहिरींनी तळ गाठला. गावातील राजगुरु यांची विहीर काझी यांच्या मालकीच्या विहिरीवर टँकरची लांबच लांब रांग दररोज लागायची. येथून एका टँकरला चार ते पाच तास लाइनमध्ये उभे रहावे लागत असून, त्या विहिरींनी डिसेंबर अखेर तळ गाठल्याने १५0 रुपये ५00 लिटरकरिता मोजावे लागत होते. त्या ५00 लिटर पाण्याकरि ता ५00 रुपये मोजावे लागत आहे. ५00 रुपये मोजूनही पाणी मिळत नसल्याने जीवाची लाही-लाही होत होती. विहीर मालकांनी चक्क तीन रुपये हंडा याप्रमाणे पाणी विकणे सुरु केले होते. त्यामुळे कोरडी योजनाच एकमेव आधार होती. कोराडी प्रकल्पावरून साखरखेर्डापर्यंंंत १२ किमी पाइपलाइन एअर वॉल्व्ह दुरुस्तीकरिता आणि विहिरीवरील मोटरपंप दुरुस्ती, जलशुद्धीकरण यंत्राची दुरुस्तीकरिता दोन महिने लागले. गणेश पळसकर, शालीग्राम गवई, गजानन मगर यांनी दिवसरात्र एक करीत सर्व कामे हा ताळीत ३ जानेवारीला पाणी जलशुद्धी केंद्रापर्यंंंत आणले. २४ तासापैकी ८ तास वीज मिळत असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. वीज वितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीने विनंती करून विहिरीवरील वीज पुरवठा ए.जी.वरून गाव फिडरवर जोडण्याची विनंती केली. या समस्यांची दखल घेत वीज वितरण कंपनीने सकारात्मकपणे तत्काळ निर्णय घेऊन विजेचा प्रश्न ५ जानेवारीला सुटला आणि साखरखेर्डा गावात ६ जानेवारीला नळाला पाणी सुटले. गंभीर पाण्याचा प्रश्न सुटताच महिलांनी आनंद व्यक्त केला.