शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

आदिवासी गावाला हवे विकासाचे कोंदण

By admin | Updated: January 7, 2015 00:28 IST

*बुलडाणा जिल्ह्यातील दुर्लक्षीत नैसर्गिक सौंदर्याचं लेणं; पर्यावरण परिषदेच्या निमित्ताने विकासाची चर्चा होण्याची गरज.

जयदेव वानखडे / जळगाव जामोद (बुलडाणा):सातपुडा पर्वताच्या रांगेत उंच ठिकाणावर वसलेलं १५00 लोकवस्तीचं आदिवासी ग्राम भिंगारा एक नैसर्गिक सौंदर्याचं लेणं आहे. निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळलेलं येथील पर्यावरण सौंदर्य माणसाच्या मनाला भुरळ घालते; मात्र हे गाव आजही विकासापासून वंचित आहे. येत्या ९ तारखेला येथे पर्यावरण परिषद होत आहे या निमित्ताने या गावाचा इतिहास व प्रश्नांचीही चर्चा होऊन विकासाचे नवे चक्र सुरू होण्याची अपेक्षा आदिवासी बांधवांमध्ये आहे.जळगाव जामोद शहराच्या उत्तरेस बर्‍हाणपूर रस्त्याच्या पूर्वेस २१ किमी. अंतरावर हे गाव वसलं आहे. सातपुड्यातील सर्वात उंच ठिकाणावर असलेले हे ठिकाण उत्तम थंड हवेचं ठिकाण आहे. येथे आदिवासी भिल, कोरकू, न्याहाल आणि गोंड लोकांची वस्ती असून या जमातीचे लोक सध्या पर्व पायथ्याशी इतरत्र येऊन वस्तीने राहू लागले; मात्र सध्या भिलाला, पावरा, बारेला या आदिवासी जमाती येथे आढळतात. सर्व भिलाला जातीचे आदिवासी मुले आता शहराच्या सान्निध्यात राहून शिकायला लागली आहेत. उद्योगांची आस धरत आहेत. परंतु अपुरे मार्गदर्शन आणि शिक्षणाबाबतीत येणार्‍या अडचणींमुळे ती मागे राहिली आहेत.ही मुले शिकली; मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रांचा प्रश्न शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असल्याने तो या आदिवासींच्या विकासातील सर्वात मोठा अडसर ठरत आहे. त्या कारणाने त्यांच्या मुलांना कुठल्याही शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत. शासकीय योजनांच्या लाभापासून ते वंचित राहतात. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आरक्षणापासून अद्यापही वंचित आहेत. तो प्रश्न लवकर निकाली काढल्यास हे आदिवासी निश्‍चितच विकासाच्या प्रवाहात येतील.