शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:36 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ हजार २५५ गावांचे जल जीवन मिशनअंतर्गतचे कृती आराखडे तयार करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ...

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ हजार २५५ गावांचे जल जीवन मिशनअंतर्गतचे कृती आराखडे तयार करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हाती घेतलेली आहे. त्याअंतर्गत ७ ऑगस्टपर्यंत हा पंधरवडा राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने ग्रामस्तरावर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत गावांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेला यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. यात १३ ही तालुक्यांतील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे दोन सदस्य यांचा यात समावेश होता. यामध्ये पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक तायडे, कार्यकारी अभियंता राहुल जाधव, शाखा अभियंता चंद्रशेखर पिंपरकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील मूल्यमापन सल्लागार प्रशांतगिरी, मनुष्यबळ विकास सल्लागार मनीषा शेजव, पाणी गुणवत्ता सल्लाकार किरण शेजोळ, वैभव ढांगे यांनी मार्गदर्शन केले.

--उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन--

ग्रामपातळीवर घरपरत्वे शुद्ध पाणी मिळावे यादृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात ग्रामस्तरावरून सक्रिय सहभाग घेण्यात येऊन अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण केले जावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल बुधवत यांनी केले आहे.