शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:36 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ हजार २५५ गावांचे जल जीवन मिशनअंतर्गतचे कृती आराखडे तयार करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ...

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ हजार २५५ गावांचे जल जीवन मिशनअंतर्गतचे कृती आराखडे तयार करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हाती घेतलेली आहे. त्याअंतर्गत ७ ऑगस्टपर्यंत हा पंधरवडा राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने ग्रामस्तरावर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत गावांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेला यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. यात १३ ही तालुक्यांतील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे दोन सदस्य यांचा यात समावेश होता. यामध्ये पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक तायडे, कार्यकारी अभियंता राहुल जाधव, शाखा अभियंता चंद्रशेखर पिंपरकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील मूल्यमापन सल्लागार प्रशांतगिरी, मनुष्यबळ विकास सल्लागार मनीषा शेजव, पाणी गुणवत्ता सल्लाकार किरण शेजोळ, वैभव ढांगे यांनी मार्गदर्शन केले.

--उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन--

ग्रामपातळीवर घरपरत्वे शुद्ध पाणी मिळावे यादृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात ग्रामस्तरावरून सक्रिय सहभाग घेण्यात येऊन अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण केले जावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल बुधवत यांनी केले आहे.