शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मेंहदी लावायच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:36 IST

या वर्षी उन्हाळ्यात लग्नसराईत अनेकांनी लग्नाच्या तारखा काढून त्या दृष्टीने लगीनघाई सुरू केली होती. मात्र, ऐन मार्च महिन्यात कोरोनाचे ...

या वर्षी उन्हाळ्यात लग्नसराईत अनेकांनी लग्नाच्या तारखा काढून त्या दृष्टीने लगीनघाई सुरू केली होती. मात्र, ऐन मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहून सर्वांनीच धास्ती घेतली. आपल्या मुलांचे लग्न अशा कठीण काळात कसे लावायचे, याची चिंता वधू-वर पित्यांना पडली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत विवाह मुहूर्त जास्त असतात. अगोदरच सहा महिन्यापासून वधू-वर पित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय व मंडप डेकोरेशन बुक केले होते. लग्नसराईची लगबग व धावपळही सुरू होती, परंतु मार्च अखेर व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना संसर्गाबाबत जनजागृती वाढली व कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाऊनचा वाढता कालावधी वधू-वर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने निघत असल्याने व अनेकांचा मृत्यूही होत असल्याने विवाह सोहळे मोजक्‍याच उपस्थित लावण्याचे निर्बंध लादण्यात आले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणाही विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने, वधू-वर पित्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लग्नाची घाई करू नका, पुढेही आहेत लग्नाचे मुहूर्त

आपल्या लाडक्या मुला-मुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे, म्हणून अनेक वधू-वर पिता लपून छपून विवाह आयोजित करीत आहेत. पुढील काही महिन्यात मुहूर्त नाहीत, असा चुकीचा समज करून विवाह समारंभ आयोजित केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. लग्नाची घाई करू नका, पुढेही आहेत लग्नाचे मुहूर्त असे म्हणण्याची वेळ आली आहे.