शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

दूषित पाण्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

By admin | Updated: April 28, 2017 00:29 IST

नागरिक पितात झऱ्यातील दूषित पाणी : पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती

किशोर मापारी - लोणारतालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या चार वर्षाच्या दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या लोणार तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. सरकारी खर्चाने मागील वर्षी टँकरने व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुका टँकरमुक्त होईल, असे दिसत होते; मात्र सध्या तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा झालेला असल्यामुळे टँकरची मागणी पुढे येत आहे. लोणार शहरातील नागरिकांनाही नदीच्या झिऱ्यातून पाणी काढून प्यावे लागत आहे. याच नदीतून शहरातील सांडपाणीही वाहते. त्यामुळे हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी अल्पस्वरूपाचा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्नावरही झाला. तालुक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी विहिरी अधिग्रहण व टँकरची सुविधा करून पाणीपुरवठा मागील वर्षांपासून उन्हाळ्यात होत आहे; मात्र जलस्वराज, महाजलसारख्या ग्रामीण पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना केवळ कागदोपत्रीच राबविल्याने आणि त्यात करोडो रुपयांचा घोटाळा संबंधित अधिकारी आणि गावपातळीवर असलेल्या समितीत हातमिळवणी झाल्याने गावकऱ्यांना गेल्या १५ वर्षांपासून पाण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे. ठोस उपाययोजना होत नसल्याने तालुक्यातील जनतेला यावर्षीही भीषण पाणीसंकटाला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील पाण्याचे तलाव कोरडे पडत आहेत. विहिरी, कुपनलिका आदीच्या पाण्याने तळ गाठला आहे.पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला रणरणत्या उन्हात वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचे टँकरसाठीचे व विहिरी अधिग्रहणचे प्रस्ताव पंचायत समिती व तहसीलमध्ये दाखल झाले आहेत.योग्य नियोजन नसल्याने नागरिकांचे हालकाही गावात नियमित पाणी पुरवठा केला जात आहे; परंतु तेथे पाणी पुरवठा करण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. काही गावात तर असलेले नळ लोकांनी तोडून भंगारात विकण्यासाठी नेले आहेत, तर काही नादुरुस्त झाले असल्याने पाइपमधून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी भरून झाल्यानंतरही पाण्याच्या समस्येपासून अनभिज्ञ असल्याने त्या गावात पाणी पुरवठ्याच्या वेळेस पावसाळ्यात वाहत असलेल्या नाल्यांप्रमाणे उन्हाळ्यातही नाल्या वाहत असल्याची स्थिती आहे. हे नळ पुन्हा लावण्याची, ते दुरुस्त करण्याची कोणतीही तरतूद तेथील ग्रामपंचायतीने केली नसल्याचे दिसत आहे. एकीकडे लोकांना, प्राणी, पक्षी व झाडांनाही जगण्यासाठी पाण्याची सोय नाही अन् दुसरीकडे पाण्याची नासाडी बघता केवळ कागदी आराखडा तयार न करता या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.