खामगाव : शहरात किती जीर्ण इमारती व घरे आहेत याबाबत पालिकेकडे ठोस स्वरूपात माहितीच उपलब्ध नाही. पालिकेने याबाबत कर्मचारी कमी असल्याची सबब देत सर्व्हे देखील केलेला नाही. केवळ सार्वजनिक स्वरूपात नोटीसवजा आवाहन करून वेळ मारून नेली जात आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या नोटिसा कधी दिल्या जातील याबाबत संभ्रमावस्था आहे. तोपयर्ंत पावसाळा सुरू होऊन जाईल याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे.शहरातील पडक्या इमारतींचे मालक तसेच नाल्याकाठी अतिक्रमण करून राहणार्या घरांचे सर्वेक्षण पालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने वैयक्तिक नोटिसा अद्यापही अशा घरमालकांना दिलेल्या नसल्यामुळे त्याबाबतची कार्यवाही थंड बस्त्यात आहे. पावसाळ्यात विशेषत: संततधार पावसात कच्ची अर्थात मातीची घरे तसेच जीर्ण झालेल्या इमारती पडण्याची भीती असते. अशामुळे नाहक काही जणांना अपघातालाही सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता अशा इमारती खाली करून त्या दुरुस्त करून घ्याव्या किंवा पाडून टाकाव्या याबाबत पालिकेतर्फे आवाहन केले जाते. परंतु सर्वेक्षण करून वैयक्तिक नोटिसा देण्याबाबत टाळाटाळ केले जाते. यंदादेखील पालिकेने अद्यापही अशा इमारतींचे सर्वेक्षण केलेले नाही.
शिकस्त इमारतींबाबत गांभीर्य नाही
By admin | Updated: May 29, 2014 00:50 IST