मेहकर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे खारीज करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये मेहकर तहसीलदार यांना २३ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. मेहकर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील कामासंदर्भात सुनील चव्हाण, प्रमोद पाटील यांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांची कामे अडवून ठेवून पैशांची मागणी केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत प्रमोद पाटील यांना जाब विचारला तर दुय्यम निंबधक कार्यालयातील लिपीक प्रमोद पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक कार्येकर्ते सागर कानोडजेसह इतर दोन जणांना २२ सप्टेंबर रोजी मेहकर पोलीस स्टेशन येथे खोट्या गुन्ह्यात अडकवून वरिष्ठांच्या दबावामुळे ही कार्यवाही केली. यावेळी महाराष्ट्रातील दुय्यम निंबधक कार्यालयातील कर्मचारी संपावर असतांना देखील ही खोटी कार्यवाही केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेवरील खोटे गुन्हे तत्काळ खारीज करावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सह जिल्हानिंबधक श्रेणी १, पोलीस अधीक्षक बुलडाणा यांना देण्यात आल्या. यावेळी तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, शहर अध्यक्ष अशफाक शहा, ऋषांक चव्हाण, देवेंद्र आखाडे, कैलास उतपुरे, अभिमन्यू देशमुख, सतीश देशमुख, मिथुन साळवे, प्रवीण उतपुरे, डिंगांबर सरकटे उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST