शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘स्वाभिमानी’चा जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: June 3, 2017 00:27 IST

चिखली : शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी खोळंबणार असल्याचे पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३१ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना घेराव घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर विकून दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी त्यांना त्याचे चुकारे मिळालेले नाहीत, तसेच मोजपट्ट्या मिळाल्या नाही, तर अनेकांची मोजनोंदही रजिस्टरला घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी खोळंबणार असल्याचे पाहून या गलथान कारभाराविषयी रोष व्यक्त करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३१ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. दरम्यान, शेतकऱ्यांना तातडीने चुकारे न दिल्यास आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले आहे. चार पैसे जादा मिळतील, या आशेने त्यांनी आपली तूर नाफेडला दिली आहे; परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शासकीय तूर खरेदीचे नियोजन चुकले आणि शेतकऱ्यांच्या हातावर मात्र तुरी दिल्या जात असल्याचा प्रकार होत असून, शेतकऱ्यांनी नाफेडला तूर देऊन दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत त्यांच्या मालाचे दाम मिळाले म्हणजे चुकारे मिळाले नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत अडकले असून, याची दखल घेत राज्यशासन आणि नाफेड यांच्याबद्दल रोष व्यक्त करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, भारत वाघमारे, विलास तायडे, भरत जोगदंडे, अनिल चव्हाण, अनिल वाकोडे व कार्यकर्त्यांनी ३१ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी चिखली येथे आले असता, त्यांना घेराव घालून याप्रकरणी मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी लक्ष घालून सात दिवसाच्या आत चुकारे न दिल्यास कारवाईचे आदेश दिले होते; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने तीव्र रोष व्यक्त करीत तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे व शेतकऱ्यांच्या मोजमापाच्या नोंदी करून मोजमापपट्ट्या देण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांची नाफेड केंद्रावरील पिळवणूक थांबण्यात यावी, नोंद झालेली तूर विनाविलंब खरेदी करण्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या, तसेच या मागण्यांची पूर्तता न झाल्यास बेमुदत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.