शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

प्रकल्प बाधितांचा १५ जूनपर्यंत सर्व्हे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ...

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे. पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा

-------------डबलबातमी--------------------------------------------------------------------------------

मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पाच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे २०१२ पासून तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यांना तत्काळ सर्व्हे करून मदत देण्यासाठी अहवाल १५ जूनपर्यंत पूर्ण न केल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ जून पासून पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे.

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे.