शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

प्रकल्प बाधितांचा १५ जूनपर्यंत सर्व्हे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ...

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे. पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा

-------------डबलबातमी--------------------------------------------------------------------------------

मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पाच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे २०१२ पासून तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यांना तत्काळ सर्व्हे करून मदत देण्यासाठी अहवाल १५ जूनपर्यंत पूर्ण न केल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ जून पासून पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे.

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे.