शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प बाधितांचा १५ जूनपर्यंत सर्व्हे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ...

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे. पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा

-------------डबलबातमी--------------------------------------------------------------------------------

मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पाच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे २०१२ पासून तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यांना तत्काळ सर्व्हे करून मदत देण्यासाठी अहवाल १५ जूनपर्यंत पूर्ण न केल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ जून पासून पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे.

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे.