शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांना आधार देणार

By admin | Updated: January 8, 2015 01:08 IST

राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षवर्षाताई देशपांडे यांचा निर्धार.

बुलडाणा :शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा गेल्या दशकापासून अतिशय गंभीर झाला आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने शासनाने कर्जमाफीपासून तर पॅकेजपर्यंत अनेक योजनांचा रतिब घातला; मात्र आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. हा सर्वात मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र या प्रश्नामध्ये शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवण्यात आला. ज्या शेतकर्‍याने आत्महत्या केली त्या घरातील विधवा आजही मोठय़ा हिमतीने कुटुंब सांभाळत आहेत. कुटुंबप्रमुख गेल्यावर त्या घराची स्थिती आणखीच खालावली आहे. अशा स्थितीत या विधवा महिलांच्या समस्यांकडे कुणाचेही लक्ष नाही, त्यामुळे येणार्‍या काळात अशा महिलांसाठी लढा उभारून काम करण्याचा निर्धार राज्य महिला लोक आयोगाच्यावतीने करण्यात आला आहे, अशी माहिती वर्षाताई देशपांडे यांनी दिली. राज्य महिला लोक आयोगाच्यावतीने बुलडाण्यात बुधवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या पृष्ठभूमीवर आयोगाच्या कार्याध्यक्ष वर्षा देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, येणार्‍या काळात राज्य महिला लोक आयोगाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना तातडीने कुठल्या आधाराची गरज आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. सर्वात आधी अशा महिलांसाठी हेल्पलाईन व कायदेविषयक सल्ला सुरू करीत असून, त्या माध्यमातून पॅकेज किंवा कर्जमाफीचा लाभ अशा कुटुंबांना झाला का? याचाही शोध घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी महिला लोक आयोगाच्या समन्वयक जिजा चांदेकर व जिल्हाध्यक्ष अँड.सोनाली सावजी देशपांडे उपस्थित होत्या.