शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जिभेचे लाड थांबवा, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST

जिल्ह्यात अल्सरच्या रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला नागरिकांकडून पसंती दिली ...

जिल्ह्यात अल्सरच्या रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. मात्र अतिप्रमाणात तिखट खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आहारात तिखट पदार्थांचा समावेश अधिक असलेल्यांना अल्सर आजाराचा त्रास उद्भवल्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत.

काय आहेत लक्षणे..

पोट दुखणे

मळमळ होणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

काळे शौच होणे

ॲसिडिटी वाढणे

पौष्टिक आहारावर भर देणे आवश्यक

अनेकांना तिखट खाण्याची आवड असते. मात्र तिखट अतिप्रमाणात खाल्ल्यास अल्सर होण्याची शक्यता असते. एंडोस्कोपीने अल्सरचे निदान होते. यानंतर पातळ औषधे, गोळ्या असे पूर्णत: उपचार यांवर शासकीय व खासगी दोन्ही यंत्रणांत उपलब्ध आहेत.

-डॉ. अनिलकुमार तराळे, सर्जन.

अल्सरवर लवकर निदान झाल्यास १०० टक्के उपचार शक्य आहे. शासकीय यंत्रणेतही याचे उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांनी न घाबरता योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. यात मसालेदार व तिखट अतिप्रमाणात सेवन केल्याने अल्सर होण्याची शक्यता असते.

- डॉ. समृद्धी काळपांडे, सर्जन.

काय काळजी घ्यावी...

- अल्सर होऊ नये, याकरिता तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळणे, मन शांत ठेवणे, योग्य पद्धतीचे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे.

- पोटातील अल्सरचे वेळेवर निदान केल्यानंतर व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेऊन मन:स्थिती ठीक ठेवल्यास हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.

- तिखट पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांचे प्रमाण नियंत्रणात असायला हवे. आहारातील तिखट पदार्थांचा समतोल व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.