शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जिभेचे लाड थांबवा, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST

जिल्ह्यात अल्सरच्या रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला नागरिकांकडून पसंती दिली ...

जिल्ह्यात अल्सरच्या रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. मात्र अतिप्रमाणात तिखट खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आहारात तिखट पदार्थांचा समावेश अधिक असलेल्यांना अल्सर आजाराचा त्रास उद्भवल्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत.

काय आहेत लक्षणे..

पोट दुखणे

मळमळ होणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

काळे शौच होणे

ॲसिडिटी वाढणे

पौष्टिक आहारावर भर देणे आवश्यक

अनेकांना तिखट खाण्याची आवड असते. मात्र तिखट अतिप्रमाणात खाल्ल्यास अल्सर होण्याची शक्यता असते. एंडोस्कोपीने अल्सरचे निदान होते. यानंतर पातळ औषधे, गोळ्या असे पूर्णत: उपचार यांवर शासकीय व खासगी दोन्ही यंत्रणांत उपलब्ध आहेत.

-डॉ. अनिलकुमार तराळे, सर्जन.

अल्सरवर लवकर निदान झाल्यास १०० टक्के उपचार शक्य आहे. शासकीय यंत्रणेतही याचे उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांनी न घाबरता योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. यात मसालेदार व तिखट अतिप्रमाणात सेवन केल्याने अल्सर होण्याची शक्यता असते.

- डॉ. समृद्धी काळपांडे, सर्जन.

काय काळजी घ्यावी...

- अल्सर होऊ नये, याकरिता तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळणे, मन शांत ठेवणे, योग्य पद्धतीचे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे.

- पोटातील अल्सरचे वेळेवर निदान केल्यानंतर व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेऊन मन:स्थिती ठीक ठेवल्यास हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.

- तिखट पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांचे प्रमाण नियंत्रणात असायला हवे. आहारातील तिखट पदार्थांचा समतोल व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.