शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिभेचे लाड थांबवा, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST

जिल्ह्यात अल्सरच्या रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला नागरिकांकडून पसंती दिली ...

जिल्ह्यात अल्सरच्या रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गोडपेक्षा तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. मात्र अतिप्रमाणात तिखट खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आहारात तिखट पदार्थांचा समावेश अधिक असलेल्यांना अल्सर आजाराचा त्रास उद्भवल्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत.

काय आहेत लक्षणे..

पोट दुखणे

मळमळ होणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

काळे शौच होणे

ॲसिडिटी वाढणे

पौष्टिक आहारावर भर देणे आवश्यक

अनेकांना तिखट खाण्याची आवड असते. मात्र तिखट अतिप्रमाणात खाल्ल्यास अल्सर होण्याची शक्यता असते. एंडोस्कोपीने अल्सरचे निदान होते. यानंतर पातळ औषधे, गोळ्या असे पूर्णत: उपचार यांवर शासकीय व खासगी दोन्ही यंत्रणांत उपलब्ध आहेत.

-डॉ. अनिलकुमार तराळे, सर्जन.

अल्सरवर लवकर निदान झाल्यास १०० टक्के उपचार शक्य आहे. शासकीय यंत्रणेतही याचे उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांनी न घाबरता योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. यात मसालेदार व तिखट अतिप्रमाणात सेवन केल्याने अल्सर होण्याची शक्यता असते.

- डॉ. समृद्धी काळपांडे, सर्जन.

काय काळजी घ्यावी...

- अल्सर होऊ नये, याकरिता तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळणे, मन शांत ठेवणे, योग्य पद्धतीचे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे.

- पोटातील अल्सरचे वेळेवर निदान केल्यानंतर व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेऊन मन:स्थिती ठीक ठेवल्यास हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.

- तिखट पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांचे प्रमाण नियंत्रणात असायला हवे. आहारातील तिखट पदार्थांचा समतोल व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.