शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

जिल्ह्यातील गावकारभाऱ्यांची आकडेमोड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. १८ जानेवारीला सकाळी मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर आता उमेदवारांना निकालाची ...

बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. १८ जानेवारीला सकाळी मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर आता उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाच्या टक्केवारीवरून गावागावात गावकारभाऱ्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ९ हजार २२९ उमेदवारंची चिंता वाढली आहे. मतदानानंतर निकालामध्ये दोन दिवसांचा अवधी मिळाल्याने गावागावात सध्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. आपल्या गावात किती मतदान झाले, त्यामध्ये वार्डातील मतदान किती होते, याची बेरीज सध्या उमेदवार करत आहेत. महिन्याभरापासून कामाला लागलेल्या उमेदवारांना मतदानानंतरही १५ डिसेंबर रोजी रात्री निकालाच्या उत्सुकतेने शांत झोप लागली नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशांचे पालन करण्यातही या उमेदवारांची मोठी दमछाक झाली. नियमाचे पालन करत असताना निवडणूक प्रचारात कुठे कमी पडायला नको, म्हणून उमेदवारांनी दिवस-रात्र एक केली. आता प्रत्यक्ष आपल्या गावात मतदारांनी कोणाला कौल दिला, याची उत्कंठा उमेदवारांना आहे.

गावांचे कारभारी कोण होणार?

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय मिळवून सरपंचपद मिळणे म्हणजे त्या गावातील प्रतिष्ठेचे स्थान समजल्या जतो. परंतु आता निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार? आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्यांचेच स्वप्न रंगविलेले आहे. गावांचे कारभारी कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती

बुलडाणा जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींमध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सागवण ग्रामंपचायतमध्येही निवडणुकीची चांगलीच चुरस लागली होती. देऊळघाट, डोणगाव, साखरखेर्डा यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्येही निवडणूक चुरशीची ठरली. यामध्ये काही उमेदवार सख्ये नातेवाईकच एकमेकांविरोधात रिंगणात उभे होते.

निकालानंतर बंदोबस्त वाढविण्याची गरज

जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट आणि मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे हाणामारी झाल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे या दोन्ही गावांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही निकालानंतर पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.

निवडणुकीचे चित्र

ग्रामपंचायत संख्या ४९८

उमेदवार ९२२९

मतदान केंद्र १८०३

झालेले मतदान ७ लाख ५० हजार ९२९