शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गावकारभाऱ्यांची आकडेमोड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. १८ जानेवारीला सकाळी मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर आता उमेदवारांना निकालाची ...

बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. १८ जानेवारीला सकाळी मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर आता उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाच्या टक्केवारीवरून गावागावात गावकारभाऱ्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ९ हजार २२९ उमेदवारंची चिंता वाढली आहे. मतदानानंतर निकालामध्ये दोन दिवसांचा अवधी मिळाल्याने गावागावात सध्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. आपल्या गावात किती मतदान झाले, त्यामध्ये वार्डातील मतदान किती होते, याची बेरीज सध्या उमेदवार करत आहेत. महिन्याभरापासून कामाला लागलेल्या उमेदवारांना मतदानानंतरही १५ डिसेंबर रोजी रात्री निकालाच्या उत्सुकतेने शांत झोप लागली नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशांचे पालन करण्यातही या उमेदवारांची मोठी दमछाक झाली. नियमाचे पालन करत असताना निवडणूक प्रचारात कुठे कमी पडायला नको, म्हणून उमेदवारांनी दिवस-रात्र एक केली. आता प्रत्यक्ष आपल्या गावात मतदारांनी कोणाला कौल दिला, याची उत्कंठा उमेदवारांना आहे.

गावांचे कारभारी कोण होणार?

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय मिळवून सरपंचपद मिळणे म्हणजे त्या गावातील प्रतिष्ठेचे स्थान समजल्या जतो. परंतु आता निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार? आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्यांचेच स्वप्न रंगविलेले आहे. गावांचे कारभारी कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती

बुलडाणा जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींमध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सागवण ग्रामंपचायतमध्येही निवडणुकीची चांगलीच चुरस लागली होती. देऊळघाट, डोणगाव, साखरखेर्डा यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्येही निवडणूक चुरशीची ठरली. यामध्ये काही उमेदवार सख्ये नातेवाईकच एकमेकांविरोधात रिंगणात उभे होते.

निकालानंतर बंदोबस्त वाढविण्याची गरज

जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट आणि मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे हाणामारी झाल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे या दोन्ही गावांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही निकालानंतर पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.

निवडणुकीचे चित्र

ग्रामपंचायत संख्या ४९८

उमेदवार ९२२९

मतदान केंद्र १८०३

झालेले मतदान ७ लाख ५० हजार ९२९