शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

नाला बांधातील गाळ काढण्यास सुरुवात

By admin | Updated: February 27, 2016 01:56 IST

लोकसहभागातून होणार काम; पाणी साठा वाढून सिंचनाची होणार सुविधा.

अंजनीखुर्द (जि. बुलडाणा): जलसंधारणाच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या तालु क्यातील अंजनी खुर्द येथील सिमेंट नाला बांधातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामास आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते बुधावारपासून शुभारंभ करण्यात आला आहे.गत दोन वर्षांत पाण्याआभावी शेती पिकांचे उत्पादनात ७0 टक्के घट आली आहे. या समस्येवर मात करून सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होण्याकरिता राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत जलयुक्त शिवार हे अभियान राबवण्यात येत असून, याकरिता मोठा निधीही उपल्बध करून दिल्या जात आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचनाचे नवीन स्रोत निर्माण करताना मात्र जुन्या स्रोतांकडे दुर्लक्ष होत होते. सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी यापूर्वी विविध योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी नदी -नाल्यांवर जागोजागी साखळी पद्धतीने सिमेंट बांध बांधण्यात आले. या बांधामुळे नदी- नाल्यांच्या काठावरील दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांना शेतीसाठी हमखास पाणी उ पल्बध होऊन शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला. पावसाचे पाणी जागीच अडवून ते जमिनीतच जिरवल्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी मुबलक पाणी साठा संचीत होऊन मोठय़ा प्रमाणावर शेतजमीन सिंचित झाल्या. परंतु १५ वर्षात सिमेंट नाला बांधाच्या पात्रामध्ये गाळ साचला आहे. अशा नाल्यातील गाळ काढून नाला खोलीकरण केल्यास ही समस्या बर्‍याच अंशी कमी होईल. दरम्यान अंजनी खुर्द येथील सिमेंट नाला बांधातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामाचा आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार सुरेश कव्हळे, गट विकास अधिकारी ओमप्रकाश यादव, कृउबास सभापती शिव पाटील तेजनकर, पं.स. सभापती ज्ञानेश्‍वर चिभडे, तालुका शिवसेना प्रमुख प्रा.बळीराम मापारी, कांता पाटील वायाळ, माजी सरपंच मंडोधर चौधरी, भाजपा शहराध्यक्ष विजय मापारी, राष्ट्रवादीचे भगवान महाजन, मिलिंद पिंपरकर, बाळकृष्ण राठी व शेतकरी उपस्थित होते.