शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ात वाढली टरबुजाची लागवड

By admin | Updated: December 18, 2014 01:07 IST

आधुनिक शेतीची कास : मल्चिंग पद्धतीने लागवड करण्यावर भर.

पंजाबराव ठाकरे / संग्रामपूर (बुलडाणा)  

      खारपाणपट्टय़ात मल्चिंग पेपरच्या वापराने टरबूज लागवडीचे क्षेत्रफळ वाढते आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वा पर करण्यात युवा शेतकर्‍यांची आघाडी दिसत आहे. यासाठी शासनाचे आर्थिक सहाय्य प्रोत्साहन ठरत असल्याने गतवर्षीपेक्षा यंदा दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर प्लास्टिक पेपरचा अवलंब करून टरबूज लागवडीचे टारगेट आहे. तालुक्यात खारपाणपट्टय़ाचा वाढता प्रभाव पाहता भूगर्भातील क्षारयुक्त पाणी सिंचनासाठी बाधा ठरत आहे. यामुळे जमिनीची पोत खराब होऊन चोपण होण्याचे प्रमाण वाढत आहे. अर्थात जमिनीचा सामू वाढता आहे. म्हणून या भागातील बागायती क्षेत्र वाढण्याऐवजी घटत आहे. बारमाही बागायतीसाठी जमीन निरोगी असावी म्हणून भूपृष्ठावरील पाण्याची गरज आहे. जोपर्यंंत जमिनीवरील पाणी पिकासाठी मिळणार नाही तोपर्यंंत या भागात भरपूर पाण्याची लांब दिवसाची पिके घेण्याचे क्षेत्रफळ वाढणार नाही. अशी स्थिती असल्याने पारंपरिक पद्धतीनुसार बागायती करणार्‍यांचा हिरमोड होत आहे; परंतु यामध्ये युवा शेतकर्‍यांनी बदल करण्यास सुरुवात केल्याने पाण्याचा अपव्यय टाळून केवळ पिकाच्या झाडापुर तेच पाणी देण्यासाठी व शेती तणमुक्त राहावी यासाठी मल्चिंग पेपर हा पर्याय स्वीकारण्यात हा भाग पुढाकार घेत आहे. गतवर्षी या भागासाठी कृषी विभागाकडून ६ ते ७ हेक्टरचे लक्ष्यांक होते. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी व टरबूज उन्हाळी पीक उत्पादन देणारे असल्याने यावर्षात २२ हेक्टरचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. तालुका कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकर्‍यांमध्ये याचा प्रसार केल्याने यंदा क्षेत्रफळात वाढ झाली आहे. जवळपास ४0 हेक्टर क्षेत्रफळावर टरबूज लागवड केली जाणार असून, पैकी २२ हेक्टर क्षेत्रफळामध्ये मल्चिंग पेपरचा वापर तर १८ हेक्टर क्षेत्रफळ विना मल्चिंग लागवड केली जाणार आहे. मल्चिंगमुळे तण नियंत्रण होत असल्याने किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. निंदणाचा खर्च वाचविता येतो. फळे सारख्या आकाराची व दज्रेदार तयार होतात. त्यामुळे बाजारात मागणी राहते. पाण्याचा वापर फक्त वेलापुरताच होत असल्याने इतर जमीन खराब होत नाही. शासनाच्या या योजनेमुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे दिसत आहे.