शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

केवळ १४ हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: July 22, 2014 23:49 IST

तालुक्यात ४५ मि.मी. पावसाची नोंद असून गत पाच वर्षातील हा निच्चांक आहे. झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ १४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या आहेत.

खामगाव : यावर्षीच्या खरीप हंगामास दीड महिना उलटूनही दमदार पाऊस बरसलाच नाही. आज २२ जुलैपर्यंत तालुक्यात ४५ मि.मी. पावसाची नोंद असून गत पाच वर्षातील हा निच्चांक आहे. झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ १४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या आहेत. तर गतवर्षी १00 टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. खामगाव तालुक्याचे शहरासह १ लाख २0 हजार २२४ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून यामधील ८४ हजार २४४ हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. तालुक्यात १४५ गावात ५४ हजार ६६२ खातेदार संख्या आहे. पेरणीसाठी उपलब्ध असलेल्या क्षेत्रापैकी हलक्या प्रतीची ४0 हजार ४१६ हेक्टर, मध्यम ३0 हजार ३७१ तर उच्च प्रतीची १३ हजार ४५७ हेक्टर जमीन आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात दरवर्षीप्रमाणे पेरण्यास सुरूवात होईल या आशेने शेतकर्‍यांनी केलेली तयारी पावसाअभावी ठप्प पडली. मृग व आद्रा नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी पार खचला आहे. पेरणीचा दीड महिना उलटूनही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी पेरणीस धजावला नाही. आतापर्यंत तालुक्यात केवळ ४५.0४ पावसाची नोंद आहे. ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र विहिरीची पाणीपातळी खालावल्याने ते सुध्दा चिंताग्रस्त आहेत. गतवर्षी १00 टक्के पेरण्या यावेळपर्यंत आटोपल्या होत्या. परंतु पुरेशा पावसाअभावी यंदा केवळ १४ हजार १0४ हेक्टर क्षेत्रावर कपाशी, सोयाबीन, उडीद, मुग, तूर, ज्वारी तसेच इतर पिकांचा पेरा झाला आहे. अद्यापही दमदार पावसाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा असून खरीप हंगामाचे नियोजन मात्र कोलमडले आहे.