शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींची सकारात्मकतेने सोडवणूक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:00 IST

चिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.

ठळक मुद्देशिवराणा मित्रमंडळाची ना. फुंडकर यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. याची दखल घेत कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींचा सकारात्मक विचार करून त्यांची सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे करण्यात आली.याबाबत ना. भाऊसाहेब फुंडकर यांना २९ जुलै रोजी माजी जि.प. अध्यक्ष तथा शिवराणा मित्रमंडळाचे संस्थापक प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी त्यांना कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींविषयी माहिती देऊन शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने निवेदन सादर केले. या निवेदनात सन २००७ ते २००९ या कालावधीतील कर्जमाफीपासून वंचित बहुधारक शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात यावे, सिलिंग कायद्याच्या भीतीने अनेक शेतकºयांनी शेतीची वाटणी कुटुंबातील सदस्यांमध्ये (खातेफोड) केली असल्याने ते सदस्य बँकेचे स्वतंत्र कर्जदार सभासदसुद्धा झालेत; परंतु शासनाने कुटुंबाची व्याख्या करून केवळ एका व्यक्तीला (कुटुंब प्रमुख) दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली व इतर सदस्य जे कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे किंवा १८ वर्षावरील असले तरी विभक्त कुटुंब रेशनकार्ड न केल्यामुळे केवळ एकाच व्यक्तीला कर्जमाफी मिळाली असल्याने प्रत्येक खातेदाराला कर्जमाफी देण्यात यावी, शासनाने कर्जमाफीची अट ३० जून २०१६ चे थकीत शेतकरी ही ठेवली आहे. तरी ही कर्जमाफी त्यांच्यावर अन्याय करणारी ठरत असल्याने कर्जमाफीची अट ३० जून २०१७ करण्यात यावी व जिल्ह्यातील शेतकºयांचे सन २०१३ ते १५ दरम्यानचे थकीत सूक्ष्म सिंचनाचे अनुदान त्वरित देण्यात यावे आणि पीक विम्याची ३१ जुलै २०१७ ची मुदत वाढविण्यात येऊन पीक विम्याचे अर्ज आॅफलाइन स्वीकारावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह शिवराणाचे श्रीकिसन धांडगे, विलाससिंह सुरडकर, नाना पवार, राजेश झगरे, सखाराम पाटील, शिवाजी पवार, विनायक पडघान, अ‍ॅड. अनिल कºहाडे, विठ्ठलराव करवंदे आदींसह तालुकाभरातील १२३ शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.