शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींची सकारात्मकतेने सोडवणूक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:00 IST

चिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.

ठळक मुद्देशिवराणा मित्रमंडळाची ना. फुंडकर यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. याची दखल घेत कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींचा सकारात्मक विचार करून त्यांची सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे करण्यात आली.याबाबत ना. भाऊसाहेब फुंडकर यांना २९ जुलै रोजी माजी जि.प. अध्यक्ष तथा शिवराणा मित्रमंडळाचे संस्थापक प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी त्यांना कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींविषयी माहिती देऊन शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने निवेदन सादर केले. या निवेदनात सन २००७ ते २००९ या कालावधीतील कर्जमाफीपासून वंचित बहुधारक शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात यावे, सिलिंग कायद्याच्या भीतीने अनेक शेतकºयांनी शेतीची वाटणी कुटुंबातील सदस्यांमध्ये (खातेफोड) केली असल्याने ते सदस्य बँकेचे स्वतंत्र कर्जदार सभासदसुद्धा झालेत; परंतु शासनाने कुटुंबाची व्याख्या करून केवळ एका व्यक्तीला (कुटुंब प्रमुख) दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली व इतर सदस्य जे कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे किंवा १८ वर्षावरील असले तरी विभक्त कुटुंब रेशनकार्ड न केल्यामुळे केवळ एकाच व्यक्तीला कर्जमाफी मिळाली असल्याने प्रत्येक खातेदाराला कर्जमाफी देण्यात यावी, शासनाने कर्जमाफीची अट ३० जून २०१६ चे थकीत शेतकरी ही ठेवली आहे. तरी ही कर्जमाफी त्यांच्यावर अन्याय करणारी ठरत असल्याने कर्जमाफीची अट ३० जून २०१७ करण्यात यावी व जिल्ह्यातील शेतकºयांचे सन २०१३ ते १५ दरम्यानचे थकीत सूक्ष्म सिंचनाचे अनुदान त्वरित देण्यात यावे आणि पीक विम्याची ३१ जुलै २०१७ ची मुदत वाढविण्यात येऊन पीक विम्याचे अर्ज आॅफलाइन स्वीकारावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह शिवराणाचे श्रीकिसन धांडगे, विलाससिंह सुरडकर, नाना पवार, राजेश झगरे, सखाराम पाटील, शिवाजी पवार, विनायक पडघान, अ‍ॅड. अनिल कºहाडे, विठ्ठलराव करवंदे आदींसह तालुकाभरातील १२३ शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.