शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंश ही नैसर्गिक आपत्ती ठरावी

By admin | Updated: July 31, 2014 01:29 IST

बुलडाणा जिल्ह्यात पाच वर्षांमध्ये ३७ मृत्युची नोंद : १ हजार ४३५ घटनांमध्ये लोकांना झाला सर्पदंश.

नीलेश शहाकार / बुलडाणामानवी वस्त्यांमध्ये वावरणारे साप आता लोकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. गेल्या पाच वर्षांत अमरावती विभागातील २४८ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात हा आकडा ३७ एवढा मोठा आहे; मात्र वन्यजीव संरक्षण कायद्यात सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांना अर्थसाहाय्य देण्याची तरतूद नसल्याने ही कुटुंबे आर्थिक अडचणीत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यात वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा व रानकुत्रे यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांना अर्थसाहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्पदंशच्या मृत्यूसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्यामुळे जिल्ह्यातील ३७ कुटुंबीयांना शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय जगावे लागत आहे. गत पाच वर्षांत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यात ११ हजार १0७ घटनांमध्ये लोकांना सर्पदंश झाला. यात २४८ जणांचा मृत्यू झाला. पाचही जिल्ह्यांतील पाच वर्षांत सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी थक्क करणारी आहे. सर्पदंशाने मृत्युमुखी पडणार्‍यांमध्ये बहुतांश शेतकरी, शेतमजुरांचा समावेश असतो; मात्र सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूला कोणतीही भरपाई देण्यास वन विभागाने हात आखडता घेतला आहे. साप जरी वन्यप्राणी असला तरी सर्पदंशामुळे बरेच मृत्यू होतात, कोणाला मदत द्यायची, याचे नियोजन नाही, असे कारण सांगत वन्यजीव मंडळाने सर्पदंश मृत्यूच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव फेटाळला. सर्पदंशमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत प्रश्न गेल्या सात-आठ वर्षापासून शासन दरबारी विचाराधिन आहे; मात्र याबाबत अद्यापही कुठलाही निर्णय झाला नाही. भविष्यामध्ये शासनाकडून सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे, असे बुलडाण्याचे तहसीलदार दिनेश गीते यांनी सांगीतले.

*बुलडाणा जिल्ह्यात ३७ मृत्युची नोंदजिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासह एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व १२ ग्रामीण रुग्णालय असे १५ रुग्णालय कार्यरत आहे. जिल्ह्यभरात कार्यरत या पंधरा रुग्णालयात सन २0१0 ते २0१४ या पाच वर्षाच्या काळात १ हजार ४३५ सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ३७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातही ग्रामीण भागातील सर्पदंशाचा आकडा मोठा आहे.