शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी शिवसंपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 00:30 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय शेतकरी आर्थिक विवंचनेतून मुक्त होणार नाही. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय शेतकरी आर्थिक विवंचनेतून मुक्त होणार नाही. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्त शिवसेना उपनेते खा.अरविंद सावंत हे दोन दिवस बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर २ जूनला येत आहेत. २ जूनला घाटावर, तर ३ जूनला घाटाखालील विधानसभा मतदारसंघनिहाय ते आढावा बैठक घेणार आहेत. त्यानिमित्ताने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबवून गावागावांतील शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज भरून घेण्याचे काम शिवसंपर्क अभियान दरम्यान करण्यात येत आहे. हे कर्जमुक्तीचे अर्ज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते खा. सावंत हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. २ जूनला सकाळी ९ वा. मेहकर विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक मेहकर येथील मारोती संस्थान जुने बस स्टँड येथे घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील योगीराज हॉटेलमध्ये, तर दुपारी ३ वाजता चिखली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक रेणुका मंगल कार्यालय येथे होणार आहे. तसेच घाटाखालील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी संत सावता मंगल कार्यालय संग्रामपूर येथे दुपारी १२ वाजता कार्यकर्त्यांची आढावा बैठक, तर दुपारी २ वाजता खामगाव येथे आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाची नांदुरा येथील एलआयसी हॉलमध्ये दुपारी ४ वाजता कार्यकर्त्यांची आढावा बैठक होईल. या बैठकीला खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमूलकर, आ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील उपस्थित राहणार आहेत. विधानसभानिहाय होणाऱ्या या आढावा बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख, शाखाप्रमुख, किसान आघाडी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.