शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठावरील शेतजमीन खरडली

By admin | Updated: June 17, 2015 01:51 IST

धाड येथे पुलात कचरा अडकल्याने गावासह शेतामध्ये शिरले पाणी.

धाड (जि. बुलडाणा): येथे सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहत आलेला कचरा बाणगंगा नदीवरील पुलात अडकल्याने गावासह परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नदीकाठावरील शेतजमीन खरडल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात दमदार पाऊस पडल्याने येथील बाणगंगा नदीला मोठा पूर आला. त्यासोबतच कचरा, लाकडेही वाहून आले. हा कचरा नदीच्या पुलात अडकून पाणी तुंबले आणि पुलावरून वाहू लागले. त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी शिरून शेतजमीन खरडून गेली. यावेळी धामणगावकडून येणारी वाहने पुलावर थांबली. यादरम्यान एक दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. नदीकाठच्या शेतात आणि गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची धावपड उडाली. धाड गावानजीक धामणगाव रस्त्यावर बाणागंगा नदीवर सन २000 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटचे नळकांडे एकावर एक रचून अनिनव पध्दतीचा असा पुल बांधला. वारंवार या पुलामध्ये पुरात वाहुन येणारा गाळ, केरकचरा अडकत असल्याने आता अर्धेअधिक नळकांडे बंद झाले आहेत. या नदीकाठी रस्त्याला लागूनच निवासी वस्ती आहे. पावसाळ्यात सलग पाऊस सुरू राहल्यास वा मोठा पूर आल्यावर या नदीवरील पुलात पुराचे पाणी अडकते. त्यामुळे पुराचे पाणी गावात, निवासी वस्तीत शिरते. कधी लगतच्या शेतांमध्ये पाणी शिरून त्यांचे नुकसान होते.