शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

थेट निवडीने सरपंच पदाला ‘ग्लॅमर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:56 IST

राजकारणात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे वा तरुणांनी नेतृत्व करावे, असली विधाने अनेक भाषणांमधून नेहमी ऐकाला मिळतात; परंतु प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा मात्न तरुणांना किती संधी दिली जाते, हे सर्वo्रृत आहे; मात्र आता थेट जनतेतून सरपंच निवडीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना राजकारणात दमदार ‘एंट्री’ मारण्याची व गावाचे नेतृत्व करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली असल्याने तालुक्यात होऊ घातलेल्या २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तरुण वर्ग सरसावला आहे.

ठळक मुद्देचिखली तालुक्यात २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर तरुणाई सरसावली!

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: राजकारणात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे वा तरुणांनी नेतृत्व करावे, असली विधाने अनेक भाषणांमधून नेहमी ऐकाला मिळतात; परंतु प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा मात्न तरुणांना किती संधी दिली जाते, हे सर्वo्रृत आहे; मात्र आता थेट जनतेतून सरपंच निवडीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना राजकारणात दमदार ‘एंट्री’ मारण्याची व गावाचे नेतृत्व करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली असल्याने तालुक्यात होऊ घातलेल्या २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तरुण वर्ग सरसावला आहे. तर नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता जुन्या नेतृत्वापेक्षा तरुणांमध्येच अधिक आहे. शिवाय तरुणांमध्ये योग्य ‘टॅलेंटही’ असल्याचे सर्वसामान्य ग्रामस्थांनाही आता कळायला लागले आहे. त्यामुळे गावपतळीवर तरुणांच्या नेतृत्वास जनाधारदेखील मिळत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या गावांत हय़ा निवडणुका होणार आहे त्या-त्या गावात राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सरपंच पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षाणानंतर काहींचा हिरमोड झाला असला तरी आरक्षण व निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, मोर्चेबांधणीस आलेला वेग पाहता बहुतांश गावांत चुरशीच्या लढतीचे संकेत आहेत. तर सुशिक्षित तरुणांमध्ये राजकारणातील भ्रष्टाचार आणि इतर कुरापतीबाबत तिरस्कार असला तरी ग्रामविकासाबाबत तो सजग असल्यामुळे प्रत्यक्षात स्वत: राजकाराणात उतरून सकारात्मक बदल घडवून आणण्याची त्यांच्यात प्रचंड ओढ असल्याने उच्चशिक्षित, गावाच्या प्रत्येक निर्णयात सहभाग घेणारा तरुण वर्ग या निवडणुकीत रिंगणात प्रत्यक्ष उतरण्यासाठी सज्ज झाला असल्याने या निवडणुकांबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे निवडणुकीचे वारे वाहणार्‍या तालुक्यातील २८ गावपातळीवरील ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांकडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात झालेली आहे. राजकीयदृष्ट्या गतवेळी बहुतांश ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे प्राबल्य होते; मात्र मध्यंतरी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. तर भाजपाने या निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याने आजरोजी भाजप व काँग्रेस दोन पक्ष तुल्यबळ स्थितीत आहेत. तर इतर प्रमुख पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचाही ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.याशिवाय थेट सरपंच निवडणुकीमुळे उमेदवारांना आता संपूर्ण गावच्या मतदारांपर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मोठा खर्चदेखील करावा लागणार असल्याने थेट सरपंच पदाची निवडणूक लढविणे आर्थिकदृष्ट्या सोपे राहीले नाही. त्यासाठी सुशिक्षित, सामाजिक क्षेत्नात कार्यरत असणार्‍या उमेदवारांबरोबरच मातब्बर उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच थेट सरपंच निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. विशेष बाब म्हणजे थेट जनतेतून होणार्‍या या निवडीमुळे सरपंच पदालाही चांगलेच ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले असल्याने ग्रामीण भागातील युवक वर्ग या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सरसावला आहे. सरपंच पदासाठी जनतेतून कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून, निवडणुका अजून तीन महिन्यांवर असल्या तरी गावागावांत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षणतालुक्यातील २८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये समाविष्ट गावे व सरपंचद पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. मोहदरी (ओबीसी),  सोनेवाडी (सर्वसाधारण महिला), डासाळा (अनु. जाती महिला), आंधई (ओबीसी), पिंपरखेड (सर्वसाधारण),  सावंगी गवळी (सर्वसधारण), किन्ही सवडद (अनु. जाती महिला), करतवाडी (ओबीसी), पाटोदा (सर्वसाधारण महिला),  कव्हळा (अनु.जाती), महिमळ (ओबीसी महिला),  मुंगसरी (सर्वसाधारण), बोरगाव वसू (सर्वसाधारण), धोडप (अनु.जाती महिला), उंद्री (अनु.जाती), सातगाव भुसारी (सर्वसाधारण), वरखेड (अनु. जाती महिला), पांढरदेव (अनु. जमाती महिला), भोकर (ओबीसी), इसरूळ (ओबीसी महिला), मिसाळवाडी (ओबीसी), रानअंत्री (सर्वसाधारण), कोनड खुर्द (अनु. जाती), चंदनपूर (सर्वसाधारण), बेराळा (अनु. जाती), भानखेड (सर्वसाधारण), गुंजाळा (सर्वसाधारण) व मनुबाई (ओबीसी) याप्रमाणे आरक्षण जाहीर असून, या २८ गावांपैकी उंद्री, ईसरूळ या मोठय़ा ग्रामपंचायती असल्याने या ठिकाणी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यातऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या एकूण २८ ग्रामपंचायती तर डिसेंबरमध्ये प्रस्तावित असलेल्या ८ अशा एकूण ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. यानुषंगाने तहसीलदार मनीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील निवडणूक कक्ष सज्ज असून, प्रभाग रचना, महिला व विविध प्रवर्गांचे आरक्षण, मतदार याद्या अंतिम करणे आदी प्रक्रिया पूर्ण करून या प्रभाग रचनेवरील हरकती व आक्षेपांची सुनावणीदेखील उपविभागीय अधिकार्‍यांच्या दालनात पार पडली असून, या प्रभाग रचनांवर आता यावर केवळ जिल्हाधिकार्‍यांचे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. तर एकूण ३६ ग्रामपचायतींसाठी ११३ प्रभागातून २९८ सदस्य निवडल्या जाणार आहेत. यामध्ये खुला १३६, ओबीसी ७७, अनु.जाती ७५ तर अनु. जमाती १0 असे आरक्षण आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इच्छुक उमेदवारांना नामदनिर्देशन पत्न ऑनलाइन भरावयाचे आहे. ही सर्व प्रकिया नवीन असल्याने ग्रामीण भागातील जनतेला कोणताही त्नास होणार नाही याची दक्षता तहसील कार्यालयाकडून घेतली जात आहे. याकरिता तहसीलदार मनीष गायकवाड प्रयत्नशील आहेत.