शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘कुटुंबा’तच सशक्त, आदर्श समाजाची बीजं - डॉ. निर्मला जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:50 IST

कुटुंब व्यवस्थेतच सशक्त आणि आदर्श समाज व्यवस्थेची बीजं रुजलेली आहेत.

अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: मानसिक छळ आणि कौटुंबिक हिंसाचारामुळे समाज व्यवस्थेची चाळणी होत आहे. महिलांवरील अन्यायाला आळा बसावा यासाठी महिला तक्रार निवारण समित्या गठीत केल्या आहेत. मात्र, तरीही घरगुती आणि कामाच्या ठिकाणी महिलांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत आहे. हे समाजाचे दुर्देव म्हणावे लागेल. महिला तक्रार निवारण समितीच्या डॉ. निर्मला जाधव यांच्याशी साधलेला संवाद... 

आधुनिक युगात स्त्रीयांसमोरील आव्हानं कमी झालीत का? निश्चितच नाहीत, पूर्वीच्या काळी भारतात मातृसत्ताक कुटुंब पध्दती अस्तित्वात होती. कालांतराने पितृसत्ताक पध्दती अस्तित्वात आली. आता ५० टक्के समानता दिसत असली तरी, स्त्रीयांवरील बंधनं अजिबात कमी झालेली नाहीत. 

समाजातील वाढत्या कलहावर नियंत्रण शक्य आहे का?  निश्चितच का नाही!, नैतिक अधपतनामुळे नातेसंबधांतील तणाव वाढीस लागला आहे. अगदी लहानशा गोष्टीवरून कुटुंबांत कटुता निर्माण  होत आहे. मात्र,  विवाद सोडल्यास समाजातील वाढत्या कलहावर निर्बंध लादता येऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीत आत्मसन्माना ऐवजी दुसºयांचा सन्मान करायला शिकले की, अनेकदा वादावर नियत्रंण मिळविता येते. 

महिला तक्रार निवारण समितीला नवीन आयाम देण्यासाठी काय कराल?  स्त्री आणि पुरूष ही संसार रथाची दोन चाकं आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे कुण्या एकालाही महत्व देऊन चालणार नाही.  स्त्रीयां ह्या समाजाचे अर्धांग असून तिला सर्वांगाणं विकसीत करणं समाजाचे दायित्व आहे. मात्र, त्याचवेळी स्त्रीनं मिळालेल्या स्वातंत्र्यांचा स्वैराचार म्हणून उपभोग घेणं चुकीचे आहे. त्यामुळे महिला तक्रार निवारण समितीला स्त्री-पुरूष समानतेचे वळण देण्यासाठी आपले सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न राहतील.कुटुंब हीच मनुष्याची पहीली पाठशाळा आहे. कुटुंब व्यवस्थेतच सशक्त आणि आदर्श समाज व्यवस्थेची बीजं रुजलेली आहेत. अलिकडच्या काळात कुटुंब व्यवस्था लयास जात असल्याने समाजात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, कोणत्याही समस्या या संयमाने निकाली निघतात.

आपल्या मते घरातील वाढत्या कलहास जबाबदार कोण?सद्भावना लयास गेल्याने आजच्या समाज व्यवस्थेत कलह वाढीस लागले आहेत. क्षणिक स्वार्थ हे गृह कलह वाढीस लागण्याचे दुसरे महत्वाचे कारण होय. जुन्या पिढीतील  आदर्श बाजूला ठेवल्यानेच समाजात अनेक वाईट घटना घडताहेत. मात्र, नाते संबंध टिकवून ठेवल्यास आणि स्वातंत्र्याला स्वैराचार न समजल्यास गृह कलहावर नियंत्रण आणता येते. साध्यासाध्या गोष्टीवरून संबधांमध्ये तणाव निर्माण होत असल्याने, कलहास कुण्या एकास जबाबदार धरता येणार नाही.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत