शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Updated: July 19, 2014 00:53 IST

खामगाव तालुक्यातील बसफेर्‍यांची कमतरता : विद्यार्थी शाळेत पोहचतात उशिरा

खामगाव: शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दररोज ८ हजाराच्या जवळपास विद्यार्थी एसटीने येणे-जाणे करतात. तालुक्यासह इतर ठिकाणाहुन विद्यार्थ्यांचा लोंढा खामगाव कडे वाढत असला तरी या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी असलेल्या एस टी बसेस मात्र कमी पडत आहेत. खामगाव शहरात विविध शाळा, महाविद्यालये, आयटीआय, पॉलिटेकनिक कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज, कॉम्पुटर क्लासेस, टायपिंग क्लासेस, यासोबतच इतर शिक्षणाकरीता खामगाव तालुक्यासह नांदुरा, मोताळा, उंद्री अमडापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, देऊळगाव साकर्शा आदि ठिकाणाहुन दररोज ८ हजार विद्यार्थी ये-जा करीत आहेत. खामगाव आगारातुन या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी पासेस दिल्या जातात. खामगाव आगाराला विद्यार्थ्यांच्या पासेसमधुन दररोज १ लाखा पेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. मात्र या विद्यार्थ्यांंना एस टी मधुन प्रवास करतांना अक्षरश: झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र एसटी बस मध्ये पहावयास मिळते. सकाळी ११ वाजता शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तर एसटी मध्ये बसण्यासाठी स्पर्धाच असते. अनेक बसथांब्यावर २0-२५ विद्यार्थी बस येण्याची वाट पाहत ताटकळत उभे असतात. अगोदर एस टी बस इतर प्रवाशांनी खच्च भरलेली असतांना विद्यार्थांंनी कोठे बसावे असा प्रश्न उपस्थित होतो. खामगाव ते मेहकर, लाखनवाडा, शहापुर, माटरगाव, उंद्री, या मार्गे जाणार्‍या विद्यार्थ्यांंची कसोटीच असते. सायंकाळी शाळेतुन परतत असणार्‍या विद्यार्थ्यांंची तर खुपच हेळसांड होते. विद्यार्थ्यांंचे जत्थेच्या जत्थे खामगाव बसस्थानकावर पहावयास मिळतात. एखाद्या मार्गे उशिरा गाडी धावल्यास विद्यार्थ्यांंना थांबण्यावाचुन पर्याय नसतो. विद्यार्थ्यांंची समस्या लक्षात घेता खामगाव आगाराने ग्रामीण भागाकरीता बसफेर्‍या वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंची आहे. *शाळेच्या वेळेत हवे बसफेर्‍याचे नियोजनदिवसेंदिवस शिक्षणासाठी शहराकडे विद्यार्थ्यांंचा कल वाढला आहे. त्यामुळे ग्रामिण भागातुन हजारो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी एस टी बस मधुन पासेसद्वारे प्रवास करतात. सकाळी ११ वाजता शाळेत येतांना तसेच सायंकाळी ५ वाजेनंतर घरी जाता वेळेस विद्यार्थ्यांंना बसची आवश्यकता आहे. मात्र नेमक्या याच वेळेस विद्यार्थ्यांंना प्रवासासाठी झगडावे लागते. खामगाव आगाराने विद्यार्थ्यांंंच्या सोयीकरीता शाळेच्या यावेळेत बसफेर्‍यांचे नियोजन करुन विद्यार्थ्यांंचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.