शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Updated: July 19, 2014 00:53 IST

खामगाव तालुक्यातील बसफेर्‍यांची कमतरता : विद्यार्थी शाळेत पोहचतात उशिरा

खामगाव: शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दररोज ८ हजाराच्या जवळपास विद्यार्थी एसटीने येणे-जाणे करतात. तालुक्यासह इतर ठिकाणाहुन विद्यार्थ्यांचा लोंढा खामगाव कडे वाढत असला तरी या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी असलेल्या एस टी बसेस मात्र कमी पडत आहेत. खामगाव शहरात विविध शाळा, महाविद्यालये, आयटीआय, पॉलिटेकनिक कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज, कॉम्पुटर क्लासेस, टायपिंग क्लासेस, यासोबतच इतर शिक्षणाकरीता खामगाव तालुक्यासह नांदुरा, मोताळा, उंद्री अमडापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, देऊळगाव साकर्शा आदि ठिकाणाहुन दररोज ८ हजार विद्यार्थी ये-जा करीत आहेत. खामगाव आगारातुन या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी पासेस दिल्या जातात. खामगाव आगाराला विद्यार्थ्यांच्या पासेसमधुन दररोज १ लाखा पेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. मात्र या विद्यार्थ्यांंना एस टी मधुन प्रवास करतांना अक्षरश: झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र एसटी बस मध्ये पहावयास मिळते. सकाळी ११ वाजता शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तर एसटी मध्ये बसण्यासाठी स्पर्धाच असते. अनेक बसथांब्यावर २0-२५ विद्यार्थी बस येण्याची वाट पाहत ताटकळत उभे असतात. अगोदर एस टी बस इतर प्रवाशांनी खच्च भरलेली असतांना विद्यार्थांंनी कोठे बसावे असा प्रश्न उपस्थित होतो. खामगाव ते मेहकर, लाखनवाडा, शहापुर, माटरगाव, उंद्री, या मार्गे जाणार्‍या विद्यार्थ्यांंची कसोटीच असते. सायंकाळी शाळेतुन परतत असणार्‍या विद्यार्थ्यांंची तर खुपच हेळसांड होते. विद्यार्थ्यांंचे जत्थेच्या जत्थे खामगाव बसस्थानकावर पहावयास मिळतात. एखाद्या मार्गे उशिरा गाडी धावल्यास विद्यार्थ्यांंना थांबण्यावाचुन पर्याय नसतो. विद्यार्थ्यांंची समस्या लक्षात घेता खामगाव आगाराने ग्रामीण भागाकरीता बसफेर्‍या वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंची आहे. *शाळेच्या वेळेत हवे बसफेर्‍याचे नियोजनदिवसेंदिवस शिक्षणासाठी शहराकडे विद्यार्थ्यांंचा कल वाढला आहे. त्यामुळे ग्रामिण भागातुन हजारो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी एस टी बस मधुन पासेसद्वारे प्रवास करतात. सकाळी ११ वाजता शाळेत येतांना तसेच सायंकाळी ५ वाजेनंतर घरी जाता वेळेस विद्यार्थ्यांंना बसची आवश्यकता आहे. मात्र नेमक्या याच वेळेस विद्यार्थ्यांंना प्रवासासाठी झगडावे लागते. खामगाव आगाराने विद्यार्थ्यांंंच्या सोयीकरीता शाळेच्या यावेळेत बसफेर्‍यांचे नियोजन करुन विद्यार्थ्यांंचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.