शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

ग्रामीण भागात पालकच बनले शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क किनगाव जट्टू : कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने पहिलीपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

किनगाव जट्टू : कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने पहिलीपासून आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, याची काळजी घेत आता ग्रामीण भागातील काही पालकच मुलांच्या हातात वह्या, पेन्सील, पाटी देऊन बाराखडीची उजळणी घेत आहेत. तसेच शुद्धलेखन गिरवत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील काही घरांमध्ये पाहायला मिळत आहे. शिक्षकाची भूमिका बजावताना पालकांची मात्र चांगलीच कसरत होत आहे. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच कोरोना आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून शाळा उघडण्यात आलेल्या नाहीत.

. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काही शाळांमध्ये नववीपासून पुढील वर्ग सुरु झाले असून, यावेळी कोरोनाविषयक सर्व नियम पाळून या मुलांची शिकवणी सुरू आहे. मात्र, पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंदच आहेत. काही प्राथमिक व माध्यमिक शाळांचे कर्तव्यदक्ष शिक्षक आठवड्याचा अभ्यास देऊन दर आठवड्याला या अभ्यासाची तपासणी करतात. असंख्य जागरूक पालकही आपल्या मुला-मुलींचे हित लक्षात घेऊन घरीच जमेल तशी मुला-मुलींकडून बाराखडी उजळणी, शुद्धलेखन व इतर अभ्यास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.