शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

लेखी आश्वासनामुळे रासपचे जलसमाधी आंदोलन स्थगित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

राहेरी बु : सिंदखेडराजा तालुक्यातील गारखेड धरण येथील गावठाण क्रमांक ३ चे राहिलेले पुनर्वसन करण्यात यावे, तसेच वस्तीत ...

राहेरी बु :

सिंदखेडराजा तालुक्यातील गारखेड धरण येथील गावठाण क्रमांक ३ चे राहिलेले पुनर्वसन करण्यात यावे, तसेच वस्तीत जाण्याकरता रस्ता तयार करण्याची मागणी रासपचे युवा जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद गणेश लवकरे यांनी मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार सिंदखेडराजा यांना निवेदन देऊन मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्याने त्यांनी ८ सप्टेंबरपासून जवळच्या धरणामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केले होते;

परंतु प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना जलसमाधी आंदोलन मागे घेण्यास परावृत्त केले़

यावेळी शासनाच्या वतीने बांधकाम विभागाचे निखिल मेहेत्रे, ग्रामसेवक मेहेत्रे, तलाठी एस. एम. नागलोत, पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल अनिल नागरे, भारत ढाकणे व त्यांना आश्वासन पत्र देऊन लवकरच ही समस्या मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे जलसमाधी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती रासपचे युवा जिल्हाध्यक्ष रामप्रसाद लवकरे यांनी दिली आहे. यावेळी आंदोलनामध्ये रासपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आटोळे, रासप युवक अध्यक्ष दीपक आघाव, राधाकिसन इंगळे, गजानन लवकरे, सोपान इंगळे, सुदाम राठोड, मधुकर लवकरे, जगन भिसे, संजय लवकरे, रघुनाथ भिसे, राजू लवकरे, अशोक इंगळे, गणेश राठोड, संदीप इंगळे, आकाश राठोड, राजू राठोड, शेख नजीर शहा, विठ्ठल भिसे, समाधान राठोड, हिम्मत राठोड, संजय राठोड, सतीश राठोड, विकास भिसे, अंकुश लवकरे, प्रकाश भालतोडे, राहुल लवकरे, महादेव इंगळे आदींसह इतर कार्यकर्ते आंदाेलनात सहभागी झाले हाेते़