शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचे कधी राईट तर कधी लेफ्ट, पळवापळवीने प्रवाशांचा वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

बुलडाणा : बाहेरगावावरून शहरात प्रवेश करताना प्रथम प्रवाशांची भेट रिक्षाचालकांशी होते. प्रत्येक प्रवाशाला शहर अनोळखी असल्याने प्रवासी रिक्षाचालकाने सांगितल्यानुसार ...

बुलडाणा : बाहेरगावावरून शहरात प्रवेश करताना प्रथम प्रवाशांची भेट रिक्षाचालकांशी होते. प्रत्येक प्रवाशाला शहर अनोळखी असल्याने प्रवासी रिक्षाचालकाने सांगितल्यानुसार रिक्षाचे भाडे द्यायला तयार होतो. याचा फायदा घेत काही रिक्षाचालक अनाेळखी प्रवाशांकडून जादा दर आकारत असल्याचे चित्र आहे.

साधारणत: बसस्थानक, जांभरून राेड, जयस्तंभ चाैक, आठवडी बाजार, चिखली राेड या ठिकाणी रिक्षांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. यातील बसस्थानकाजवळ रिक्षाचालकांची अक्षरश: स्पर्धा असते. प्रवासी उतरला की त्याला हेरण्यासाठी रिक्षाचालक त्यांच्या मागे-पुढे येतात. यामुळे प्रवासीही भांबावून जातात. अनेकजण वाटेल तेवढे दर सांगतात, तर काहीजण वाजवी दर सांगतात. मात्र, वाजवी दर सांगणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. यातून प्रवासी मात्र नाडवला जात आहे.

बसस्थानक

शहरातील बसस्थानकाच्या परिसरात रिक्षाचालकांची गर्दी असते. बसमधून उतरलेला प्रवासी आपल्यालाच मिळावा, यासाठी अनेक वेळा रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा असते. याच ठिकाणी ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारे ऑटाेही उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेताे.

भगवान महावीर चाैक

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या भगवान महावीर चाैकातही माेठ्या प्रमाणात ऑटाेचालक वाहतुकीस अडथळा करतात़ आठवडी बाजारादिवशी सर्वसामान्य नागरिकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे़

स्टेट बँक चाैक

शहरातील सर्वाधिक रहदारीचा असलेल्या स्टेट बँक चाैकातही ऑटाेचालकांची माेठी गर्दी असते़ त्यांच्यामध्ये प्रवासी घेण्यासाठी स्पर्धा असते. शासकीय कार्यालये असल्याने प्रवासी माेठ्या प्रमाणात असते़ याकडे पाेलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे़

मनमानी भाडे

शहरातील काही ऑटाेचालक मनमानी भाडे आकारत आहेत़ एरव्ही शहरात कुठल्याही भागात जाण्यासाठी प्रती प्रवासी ३० रुपये आकारण्यात येतात़

घरापर्यंत जायचे असल्याने ४० ते ६० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येते़

तसेच नवीन प्रवाशांना जादा भाडे सांगितले जाते़ शहरातील प्रवाशांना नियमित भाडे आकारले जाते़

प्रवाशांना त्रास

बसमधून उतरल्यानंतर अनेक वेळा गाेंधळ हाेताे़ कुठल्या रिक्षाचालकाला हाे म्हणायचे असा संभ्रम अनेक वेळा हाेताे़ रिक्षाचालक मनमानी दर आकारत असतात़

विजय क्षीरसागर, प्रवासी

बसस्थानक चाैकात एकाच वेळी अनेक ऑटाेचालक आवाज देत असल्याने नेमके कुणाकडे जावे, याविषयी संभ्रम हाेताे़ घरापर्यंत ऑटाे करायचा असल्यास चालक मनमानी दर आकारतात़

शरद तराळ, प्रवासी

ऑटाेवर करडी नजर

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटाेचालकांसह इतर वाहनचालकांवर वाहतूक शाखेची करडी नजर असते़ अनेक वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे़ यापुढेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटाेचालकांसह इतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल़

शांतिकुमार पाटील, प्रभारी निरीक्षक, वाहतूक शाखा, बुलडाणा