खामगाव : हमीदराने तूर खरेदी केंद्र बंद होवून तीन दिवसांचा कालावधी उलटत असताना सुध्दा शेतकऱ्यांचा या केंद्रांवर तूर ठेवून मुक्काम कायम आहे. खुल्या बाजारात तुरीला प्रतिक्ंिवटल चार हजाराचा सुध्दा दर नसल्याने हमीदरावरील ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटलने तूर विकण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी शेतकरी आशेने या केंद्रावर आहेत. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी या केंद्रांवर केली आहे, अशांची तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याची चर्चा होत असताना बुधवारी तिसऱ्या दिवशीही तुरीचे मोजमाप सुरु झाले नाही.
शेतकºयांचा‘ठिय्या’ कायम
By admin | Updated: April 26, 2017 14:15 IST