शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचे दर कमी करा, अन्यथा विक्री करू देणार नाही

By admin | Updated: May 3, 2015 02:08 IST

कृषीमंत्री एकनाथ खडसे यांचा इशारा; कपाशी बियाण्यांच्या पाकिटावरील एमआरपी कमी करण्याचेही निर्देश.

बुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी खचला आहे. त्यामुळे बीटी कापूस बियाणे कंपन्यांना दर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कंपन्या दर कमी करणार नाहीत, त्यांना राज्याच्या कोणत्याही कोपर्‍यात बियाण्यांची विक्री करू देणार नाही, असा सज्जड दम राज्याचे महसूल तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिला. गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी देशोधडीला लागला असतानाच, बियाणे कंपन्यांनी बियाणांच्या भावात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यासाठी कसरत करावी लागते. सर्वसामान्य शेतकर्‍यांना परवडेल अशा भावात बीटी बियाण्यांची विक्री करण्याचे निर्देश संबंधित कंपन्यांना दिले आहेत. भाव नियंत्रित करण्यासाठी नकार देणार्‍या कंपन्यांना आपण राज्यात कापूस बियाणे विकू देणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.              खरीप हंगाम नियोजन सभा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी नियोजनासंदर्भा त सूचना करताना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्ष अलकाताई खंडारे, आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, चैनसुख संचेती, राहुल बोंद्रे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, विभागीय कृषी सहसंचालक सु.रा सरदार, अ ितरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सभापती सुलोचनाताई पाटील आदी उपस्थित होते. *बोगस बियाणे देणार्‍यावर फौजदारी कारवाईबोगस बियाणे असल्याचे व बियाण्यांमध्ये उगवणशक्ती नसल्याचे सिद्ध झाल्यास अशा बियाणे उत्पादकांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्या जाणार आहे. संबंधित शेतकर्‍याने जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर त्याला पुराव्याची गरज पडणार नाही. उत्पादकाला निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागेल, अशी तरतूद असणारा नवीन कायदा सरकार लवकरच आणणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्नी एकनाथराव खडसे यांनी आज केले.