शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

बियाण्यांचे दर कमी करा, अन्यथा विक्री करू देणार नाही

By admin | Updated: May 3, 2015 02:08 IST

कृषीमंत्री एकनाथ खडसे यांचा इशारा; कपाशी बियाण्यांच्या पाकिटावरील एमआरपी कमी करण्याचेही निर्देश.

बुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी खचला आहे. त्यामुळे बीटी कापूस बियाणे कंपन्यांना दर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कंपन्या दर कमी करणार नाहीत, त्यांना राज्याच्या कोणत्याही कोपर्‍यात बियाण्यांची विक्री करू देणार नाही, असा सज्जड दम राज्याचे महसूल तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिला. गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी देशोधडीला लागला असतानाच, बियाणे कंपन्यांनी बियाणांच्या भावात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यासाठी कसरत करावी लागते. सर्वसामान्य शेतकर्‍यांना परवडेल अशा भावात बीटी बियाण्यांची विक्री करण्याचे निर्देश संबंधित कंपन्यांना दिले आहेत. भाव नियंत्रित करण्यासाठी नकार देणार्‍या कंपन्यांना आपण राज्यात कापूस बियाणे विकू देणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.              खरीप हंगाम नियोजन सभा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी नियोजनासंदर्भा त सूचना करताना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्ष अलकाताई खंडारे, आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, चैनसुख संचेती, राहुल बोंद्रे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, विभागीय कृषी सहसंचालक सु.रा सरदार, अ ितरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सभापती सुलोचनाताई पाटील आदी उपस्थित होते. *बोगस बियाणे देणार्‍यावर फौजदारी कारवाईबोगस बियाणे असल्याचे व बियाण्यांमध्ये उगवणशक्ती नसल्याचे सिद्ध झाल्यास अशा बियाणे उत्पादकांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्या जाणार आहे. संबंधित शेतकर्‍याने जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर त्याला पुराव्याची गरज पडणार नाही. उत्पादकाला निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागेल, अशी तरतूद असणारा नवीन कायदा सरकार लवकरच आणणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्नी एकनाथराव खडसे यांनी आज केले.