शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

रानतुळसमुळे ज्ञानगंगा अभयारण्याततील वन्यजीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:24 IST

Dnyanganga Sanctuary, Buldhana, Wildlife रानतुळसमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ज्ञानगंगा अभयारण्यात रानतुळस वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वनस्पतीच्या परिघात किटक, फूलपाखरू, मधमाशी तसेच प्राणी येत नसून गवताळ भाग कमी होत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या रानतुळसमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात असलेले ज्ञानगंगा अभयारण्य २०५ हेक्टरमध्ये पसरले आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, तडस, हरिण, नीलगाय, सांबर, कोल्हा, लांडगा, माकड, खवले मांजर, ससा, जंगली कुत्रे, सायाळ यासह विविध प्राणी आढळतात. या जंगलात सागवान, अंजन, आवळा, गोंदण, खैर, टेंभुर्णी, हिवर, कळस, काळशिवर यासह विविध वृक्ष आहेत. या जंगलात मोठ्या प्रमाणात गवत आहे. जवळपास दोन ते फूट उंच गवत या जंगलात आढळते. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्याही अधिक आहे. या जंगलात गत काही वर्षांपासून रानतुळस वनस्पतीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अत्यंत झपाट्याने ही वनस्पती वाढत आहे. रानतुळस वनस्पतीची दुगंर्धी येते. या वनस्पतीलगत कोणतेही गवत व वृक्ष वाढत नाही. तसेच किटक, फूलपाखरू, मधमाशी, भिंगोटेही या वनस्पतीवर बसत नाही. किंवा या वनस्पतीच्या आसपास भटकतही नाही. पूर्वी या जंगलात गवत मोठ्या प्रमाणात होते. मात्र आता रानतुळस वाढत असल्याने गवत कमी होत आहे. दिवसेंदिवस या वनस्पतीचे क्षेत्र वाढत आहे. रानतुळस असलेल्या भागात हरिण, रोही किंवा अन्य तृणभक्षी प्राणीही फिरकत नाहीत. यामुळे हरिण, रोही, सांबर या प्राण्यांचे खाद्यच कमी होत असल्याने हे प्राणी जंगत सोडून आजूबाजूच्या शेतातील पिकांकडे वळत आहे.वन्यजीवांचा अधिवास संकटातअत्यंत वैभवसंपन्न जैवविविधता असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात रानतुळस वाढतच आहे. या रातुळसच्या जवळपास वृक्ष, किटक, प्राणी असा कोणताही सजिव आढळत नाही. वनस्पतीला बिज मोठ्या प्रमाणात येत असून, एक झाड दुसऱ्या वर्षी आजूबाजूच्या परिसरात पसरते. त्यामुळे हळूहळू वन्यजीवांचा अधिवास संकटात येत आहे.

रानतुळस निर्मुलन रखडलेवनविभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी रानतुळसचे निर्मुलन करण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव रानतुळसचे निर्मुलन रखडले आहे. मात्र ही वनस्पती झपाट्याने वाढत असल्याने गवताळ भाग कमी होत आहे. 

 

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणा