शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

राजीव गांधी प्राणवायू प्रकल्प जीवनदायी ठरणार : मुकुल वासनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

स्थानिक अनुराधा नगर परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण मुकुल वासनिक यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी ...

स्थानिक अनुराधा नगर परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण मुकुल वासनिक यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी पार पडले. कोविड रुग्णांप्रती असलेली काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची तळमळ आजवर केलेल्या कार्याचे वासनिकांनी यावेळी कौतुक केले. माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी कोरोना काळात अनुराधा मिशनच्या अंतर्गत २०० खाटांच्या कोविड सेंटरच्या माध्यमातून केलेले कार्य व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी लाभलेल्या लोकसहभागाची माहिती प्रास्ताविकात दिली. प्रकल्प उभारणीला मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे ऋणनिर्देश याप्रसंगी व्यक्त केले. राहुल बोंद्रेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रकल्प उभारणीसाठी सरसावलेले मनोज दांडगे, नंदू शिंदे, शैलेश अय्या, सरपंच हळदे, गुडमार्निंग ग्रुपचे सदस्य आदी दात्यांचा मुकुल वासनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि. प. अध्यक्षा मनीषा पवार, श्याम उमाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला आ. राजेश एकडे, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, विजय अंभोरे, संजय राठोड, नगराध्यक्ष कासम गवळी, जि. प. सभापती ज्योती पडघान, दीपक देशमाने, अ. रफीक कादर, डॉ. इसरार, मनोज कायंदे, समाधान सुपेकर, अनंत वानखेडे, प्रदीप नागरे, दिलीप जाधव, प्रकाश पाटील, डॉ. अरविंद कोलते, अ‍ॅड. हरिश रावळ, शैलेश सावजी, देवानंद पवार, पद्म पाटील, स्वाती वाकेकर, करुणा बोंद्रे, भास्करराव ठाकरे, सुधाकर धमक, विष्णू पाटील कुळसुंदर, राम जाधव, नंदकिशोर सवडतकर, अतरोद्दीन काझी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र काळे सूत्रसंचालन केले. हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अ‍ॅड. वृषाली बोंद्रे यांनी आभार मानले.

केंद्र सरकारचा दावा खोटा : वासनिक

ऑक्सिजनमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा सपशेल खोटा आहे. केंद्र सरकार वस्तुस्थिती लोकांपासून लपवत आहे. दुसरीकडे भारतीय राज्य घटनेला साक्षी ठेवीत ज्यांनी प्रतिज्ञा केली, त्याच लोकांपासून राज्यघटनेला एकप्रकारे आव्हान दिले जात आहे. न्याय व्यवस्था व लोकशाही व्यवस्थेला त्यांच्यांचकडून धोका असल्याचे, स्पष्ट करीत केंद्रातील मोदी सरकारवर वासनिकांनी टीकास्त्र डागले.