शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

तक्रार करू न शकलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा द्या : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका पाठ सोडायला तयार नाही. अतिपावसाने शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, पीक ...

बुलडाणा : शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका पाठ सोडायला तयार नाही. अतिपावसाने शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, पीक विमा योजनेच्या हक्काच्या लाभापासून शेतकरी वंचित आहेत. ऑनलाईन तक्रार करू न शकलेल्या बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी बांधवांनासुध्दा पीक विमा योजनेच्या अंतर्गत मोबदला रक्कम मिळावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव याांनी केली.

दिल्ली येथे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १० फेब्रुवारी रोजी लोकसभेत खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. नियम ३७७ अन्वये पीक विम्याची मागणी लावून धरत शेतकऱ्यांच्या हक्काच्या मोबदल्याबाबत सरकारचे लक्ष वेधले. खासदार प्रतापराव जाधव यांनी पीक विम्याचा मुद्दा मांडत राज्य आणि खासकरुन बुलडाणा जिल्ह्यात गत काही काळात अनेक ठिकाणी पावसाने शेतकऱ्याांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यात शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक नष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे अतिपावसामध्ये प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार दाखल केल्यावर मोबदला मिळाला. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागात इंटरनेट आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता या असुविधेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ऑनलाईन स्वरुपात विमा कंपनीकडे तक्रार दाखल करू शकलेले नाहीत. या कारणांमुळे गरीब शेतकरी बांधवांना हक्काचा मोबदला न मिळाल्याने संकट ओढवले आहे. बुलडाणा जिल्ह्यात पीक कापणीनंतर अनेक वेळा अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पावसाने खराब झालेला शेतमाल मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांना विक्री करावा लागला. या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असतानाही त्यांना विम्याचा लाभ मिळू शकला नाही.

पीक विमा कंपनीच्या जाचक अटीमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यानंतर ऑनलाईन तक्रार करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकला नाही. अशा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, ऑनलाईन तक्रार करू न शकलेल्या शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेच्या अंतर्गत मोबदला रक्कम मिळावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.