शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विजेचा धोका कायमच

By admin | Updated: June 19, 2015 02:35 IST

पहिल्याच पावसात बुलडाणा जिल्ह्यातील तिघांचा बळी ; चार वर्षांमध्ये ३४ जीव गमावले.

खामगाव : यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून तिघांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला, तर मंगळवारी पाच माकडे दगावली. बुलडाणा जिल्ह्यात विजेचा वाढता धोका कायम असून, मागील चार वर्षांत तालुक्यात ३४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. मान्सूनपूर्व पावसाचे जिल्ह्यात ७ जून रोजी आगमन झाले. गेल्या आठवडाभरात पाऊस बर्‍यापैकी स्थिरावला आहे. या आठ दिवसांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ७ जून रोजी बुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील पूजा गणेश नरोटे, ८ जून रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील राधेश्याम जाधव, तर १0 जून रोजी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील अनिल मैंद यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी संग्रामपूर तालुक्यात झाडावर वीज कोसळल्याने पाच माकडे दगावली, तर शेलोडी येथील दोन म्हशी दगावल्या. हा धोका वाढताच असून, पेरणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकर्‍यांनी विजेपासून धोका पोहोचू नये, याबाबत सुरक्षितता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. *केवळ चार वीजरोधक यंत्रांचा प्रस्ताव वीज कोसळून बळी जाणार्‍यांची संख्या दरवर्षी वाढत आहे . त्या तुलनेत बुलडाण्यात केवळ चार ठिकाणी वीजरोधक यंत्रणा प्रस्तावित आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने २00९ मध्ये शेतकरीहिताचा निर्णय घेऊन राज्यभरात वीजरोधक टॉवर उभारण्याबाबत आदेश दिले होते. यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दीड कोटींचा निधी मिळाला. नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला तसेच बीड, धुळे, चिपळून, नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा टप्याटप्यातून उभारली जात आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही याबाबत पुरेसे नियोजन नसल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाकडून मिळाली.

वर्ष                जखमी             मृत्यू

२0११-१२          ४६                   ११

२0१२-१३         २२                    0६

२0१३-१४          ५८                   0५

२0१४-१५          ३९                   १२