शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या वसुलीने वीज ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

मुख्यालयी राहणे गरजेचे असताना कनिष्ठ अभियंत्यासह एकही कर्मचारी गावात राहात नाही.त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. काही अनधिकृत ...

मुख्यालयी राहणे गरजेचे असताना कनिष्ठ अभियंत्यासह एकही कर्मचारी गावात राहात नाही.त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. काही अनधिकृत व्यक्तीमार्फत वीज महामंडळाच्या नावाखाली लोकांकडून वसुली करतात व पावती देत नाहीत अशी गावात चर्चा आहे. गावामध्ये अनेक डमी मीटर बसवलेले आहेत. त्यांची विनापावती वसुली केली जाते. त्यामुळे धामणगाव येथील प्रत्येक मीटरची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे वीज महामंडळाला दर महिन्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तर दुसरीकडे जे प्रामाणिकपणे वीज बिल भरत आहेत त्यांचे वीज कनेक्शन कापण्याची धमकी दिली जाते. गावामध्ये असलेल्या अनधिकृत डमी वीज मीटरबाबत कनिष्ठ अभियंता डहाके यांना विचारणा केली असता डमी मीटरचा शोध घेतल्यास वीज मंडळाचा फायदा होईल असे सांगितले.यासंदर्भात वीज महामंडळाचे अभियंता विवेक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी

धामणगाव बढे येथे एकही कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे गावकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल नुकतेच एक निवेदन ग्रामपंचायतीतर्फे संबंधितांना देण्यात आले.

कर्मचारी जर दादागिरी करत असतील तर स्वाभिमानी संघटना त्यांना धडा शिकवेल. त्यासाठी आंदोलन करावे लागले तरी ते केले जाईल. तसेच यासंदर्भात संबंधितांशी बोलतो. कारण सर्वत्र बिकट परिस्थिती आहे. प्रश्न सुद्धा मार्गी लावू अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात बोलताना दिली.