शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पालिकेच्या घरकुलांना ‘रहिवासी’ सापडेना!

By admin | Updated: April 28, 2017 00:34 IST

१४०० च्या वर घरकुलांसाठीचा २७ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात!

अनिल गवई - खामगावशहरात शासनाच्या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करुन घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र घरकुलाचा लाभ मिळविण्यासाठी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या तरतुरीमध्ये अनेकांनी राहते अतिक्रमण न सोडता घरकुलाचा लाभ घेतला नाही. परिणामी या घरकुलांना लाभार्थी मिळाले नाही. ज्यांनी घरकुल नावावर करुन घेतले अशांपैकी अनेकांनी घरकुल भाड्यावर दिले आहेत. त्यामुळे या घरकुलांच्या निर्मितीसाठी शासनाकडून करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका म्हणून खामगाव नगरपालिकेचा नावलौकीक आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांना घरकुलाची सुविधा देण्यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा-१ अंतर्गत १४३० घरकुलांचे निर्माण करण्यात आले. या घरकुलांची निर्मिती करण्यापूर्वी शहरात विशेष सर्वेक्षण करून योजनेला सन २००७-०८ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सन २०१० मध्ये सुमारे २७ कोटी रुपयांच्या खर्चांतून घरकुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र आता रहिवाशी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.नवीन यादीला गृहनिर्माण प्रतीक्षा !शहरात १४३० घरकुलांची निर्मिती पुर्णत्वास आल्यानंतर या घरकुलाच्या वाटपासाठी लाभार्थ्यांशी पालिकेने संपर्क केला असता, केवळ १६८ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरून घरकुलांमध्ये राहण्यास अनुकुलता दर्शविली. उर्वरित लाभार्थ्यांनी नकार देत, पालिकेच्या या घरकुल योजनेला धुळकावून लावले. या पार्श्वभूमीवर पालिकेने पुन्हा सर्वेक्षण, जाहीर सभा घेत नवीन लाभार्थ्यांची यादी तयार केली. मात्र, या यादीला अद्यापर्यंत जिल्हा गृहनिर्माण समितीचा हिरवा कंदील मिळालेला नाही.घरकुलांमध्ये अतिक्रमणशहरातील शंकर नगर, शेलोडी रोड, रावणटेकडी परिसरात लाभार्थ्यांनी राहण्यास नकार दिल्यानंतर, शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेकांनी या घरकुलांमध्ये अतिक्रमण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, काही ठिकाणी या घरकुलांची तोडफोड करण्यात आल्याचेही दिसून येते.घरकुल नाकारण्याची लेखी कारणेघरकुलाचा लाभ घेण्यास नकार देणाऱ्या लाभार्थ्यांनी पालिकेला, पक्के घर बांधले, स्थानांतरण केले, राहतेघर सोडून जाण्याची इच्छा नाही, या योजनेचा लाभ नको, वैयक्तिक कारणांमुळे अशी पाच कारणे लेखी दिली आहेत. तर ७६६ लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाला कोणताही प्रतिसाद दिले नाही.कोट्यवधींचे नुकसान!या घरकुलाच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत घरकुलांच्या लाभार्थी हिस्यापोटी पालिकेस आतापर्यंत केवळ २५ लक्ष रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून लाभार्थी हिस्सा आणि इतर करापोटी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.