शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसी दंडुक्याशिवाय जमतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

बुलडाणा शहरात वाहतूक कोंडीची समस्या नवी नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. वाहतूक सुरळीत राहावी, अपघात टळावेत, यासाठी ...

बुलडाणा शहरात वाहतूक कोंडीची समस्या नवी नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. वाहतूक सुरळीत राहावी, अपघात टळावेत, यासाठी बुलडाणा शहरातील मुख्य चाैकांसह चिखली रोड, मलकापूर रोडवर सिग्नल बसविण्यात आले आहेत; परंतु हे सिग्नल नेहमी बंदच असतात. त्यामुळे वाहनचालक या सिग्नलकडे बघतसुद्धा नाहीत. सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र बुलडाण्यात पाहावयास मिळेत. सिग्नल बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च नेमका केला कशासाठी, हाच प्रश्न उपस्थित होतो. येथे सिग्नल यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. अनेक वेळा तहसील चाैकातील सिग्नलजवळच अपघात घडले आहेत. सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलीसही हजर नसतात. बाहरेगावावरून आलेल्या नवीन वाहन चालकाला बुलडाण्यात सिग्नल आहेत, तेवढा धाक मात्र दिसतो.

२०० रुपयांचा दंड एका दुचाकी चालकाला वाहतूक नियम मोडल्यास केला जातो; परंतु बुलडाण्यात सिग्नलची यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने सिग्नलवर नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलीसही हजर नसतात. बुलडाणा शहरात जयस्तंभ चाैक, संगम चाैक, तहसील चाैक, स्टेट बँक परिसर, त्रिशरण चाैक, खामगाव रोड याठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व सिग्नल बंद राहत आहेत. त्यामुळे बुलडाण्यात कागदपत्र नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणाऱ्यांवरच कारवाई होते.

स्टेट बँक चौकात सिग्नलचे थाटात उद्‌घाटन झाले. सुरुवातीचे काही दिवस सिग्नल सुरू होते, नंतर पुन्हा बंद पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सिग्नल तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.

-प्रभाकर वाघमारे.

वाहनधारकांना ई-चालानद्वारे केलेला दंड अद्यापर्यंत कळत नाही. त्यामुळे जास्त वेळा ई-चालन झालेले चालकांना माहिती होत नाही. त्याची जागृती वाहन चालकांमध्ये होणे अपेक्षित आहे.

-गजानन सवडतकर

बुलडाण्यात सिग्नल आहेत, हेच काही वाहन चालकांना माहिती नाही. सिग्नल बंद राहत असल्याने त्याकडे चालक बघतही नाहीत. अपघात टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा लवकर सुरू करावी.

-ईश्वरसिंग चंदेल.