शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकवस्तींना धोका!

By admin | Updated: October 24, 2016 02:50 IST

वर्षभरात १0७ शेतक-यांवर पशू हल्ले

बुलडाणा, दि. २३- गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील वनक्षेत्राला लागून असलेल्या लोकवस्तीतील मनुष्यांवर वन्य प्राण्यांकडून हल्ले झाल्याच्या घटना पुढे येत आहेत. मागील वर्षभराचा आढावा घेतला असता, तब्बल १0७ वेळा हिंस्र पशूंकडून मनुष्यांवर हल्ला करण्यात आला आहे. पशू हानी, पीक हानी व मनुष्य हानी मोठय़ा प्रमाणात झाली.बुलडाणा, खामगाव, मोताळा, मेहकर, लोणार या तालुक्याला लागून मोठी वनसंपदा आहे. या जंगलामध्ये विविध वन्य प्राणी व हिंस्र श्‍वापदे आढळतात. बर्‍याच वेळा वन्य प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात वस्त्याकडे येत आहेत. शिवाय सध्या कोणतेही जंगल वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित राहिले नाही. वन्य प्राण्यांच्या हक्काच्या व सुरक्षित असलेल्या जंगलात मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. परिणामी वनक्षेत्रानजिकच्या मानवी वस्तीमध्ये शेतकरी, पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांकडून प्राणघातक हल्ला होत आहे. बिबट, रानडुक्कर, अस्वल, कोल्हा, लांडगा, तडस या हिंस्र प्राण्यांकडून गिरडा, मोताळा, रोहिणखेड, नळकुंड, खडकी, धामणगाव बढे, खांडवा, कुर्‍हा, कोर्‍हाळा, डोंगरखंडळा, वरवंड पळसखेड भट, दहीद बु., गोंधनखेड, बिरसिंगपूर, हतेडी, पळसखेड, केळवद, नाईक उंद्री गावातील शेतकरी व त्यांच्या जनावरांवर हल्ले झाले आहेत.अस्वलाचा दहशत कायमगेल्या अनेक दिवसांपासून डोंगरखंडाळा, वरवंड या भागामध्ये अस्वलाने हैदोस घातला आहे. यात दोन महिन्यात पाच शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला. यामुळे येथील भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अस्वलाचा शोध घेत आहेत, तरी सुद्धा वन विभागाला अस्वलाचा शोध लागत नाही. यासाठी शासनाने या अस्वलाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.विजेची कुंपणे जनावरांच्या जीवावरशेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे हे वन्य प्राणी प्रचंड नुकसान करीत आहेत. शेतीतील पीक वाचविण्यासाठी मग शेतकरी विविध तंत्राचा वापर करतात. यातून प्राण्यांच्या जीवित्वाला धोका होतो. पिंप्री गवळी, धाड, पिंपळगाव सैलानी, चांडोळ, डोंगरखंडाळा, वरवंड, मोताळा आदी भागात वर्षभरात २५ वन्य प्राण्यांचा विजेच्या ध क्क्याने मृत्यू झाला.बोरखेड परिसरात शिकारी टोळी सक्रियरानडुकरांची हत्या करणारी शिकारी टोळी सक्रिय झाली असून, वन्य जीव विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बोरखेड, दि. २३- बोरखेड, दानापूर, बल्हाडी, वानखेड परिसरात गेल्या काही दिवसां पासून रानडुकरांची हत्या करणारी शिकारी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र, याकडे वन्य जीव विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील वसाळी, आलेवाडी या भागातील पाच ते सहा इसम सायंकाळीच्या सुमारास दाखल होतात. ज्या भागात रानडुकरांचा वावर आहे. तेथे बारुदचा फटाका लावून ठेव तात. या बारुदी फटाक्यांना खाद्य पदार्थाचे वेस्टन लावल्या जाते. त्या वासाने ते उकरून खाण्याच्या प्रयत्नात स्पंज बारुदच्या फटाक्याचा स्फोट होऊन रानडुक्कर जायबंदी होते. वेळप्रसंगी रानडुकराचा जबडा फाटून ते मृत्युमुखीदेखील पडते. जायबंदी झालेल्या रानडुकराला ही शिकारी टोळी पोत्यात टाकून घेऊन जाते. परिसरात शिकारी टोळी सक्रिय झाली असेल, तर त्या दिशेने गुप्त माहितीच्या आधारे त्वरित तपास केला जाईल.- एस.झेड. काझीवनपरीक्षेत्र अधिकारी, सोनाळा विभाग