शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पालिका, जि.प.वर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:39 IST

या वेळी आ. संजय गायकवाड, माजी आ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र ...

या वेळी आ. संजय गायकवाड, माजी आ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर, युवासेना जिल्हाधिकारी ऋषी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे व आशाताई झोरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

खा. जाधव म्हणाले, ज्या पदावर आपण काम करत आहोत, त्या पदाच्या माध्यमातून आपण पक्षासाठी काय दिले याचे आत्मचिंतन करत पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. राज्यातील सत्ताबळाचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांची कामे करीत असताना कार्यकर्त्यांनादेखील त्यांच्या निवडणुकीमध्ये व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रत्येकाने काम करावे. ‘इलेक्टिव मेरीट’ला प्राधान्य देण्याबाबत पक्ष पातळीवर विचार केला जाईल, असेही खा. जाधव म्हणाले.

या वेळी त्यांनी पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांची तयारी आणि एकंदरीत आढावा घेतला; तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक पातळीवर रिक्त व प्रभारी असलेल्या पदांबाबत चर्चा करण्यात आली. आ. गायकवाड यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना उमेदवारांना निवडून आणण्याच्या दृष्टीने जबाबदारी फिक्स करून अधिक जोमाने काम करून नियोजन केले जावे, असे सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व सहसंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनीदेखील याप्रसंगी मार्गदर्शन केले.

या बैठकीस वसंतराव भोजने, भोजराज पाटील, बाबूराव मोरे, तुकाराम काळपांडे, संजय आवताडे, राजू पाटील, शिवाजीराव देशमुख, गजानन धांडे, रामदास चौथनकर, लखन गाडेकर, सुरेश वाळूकर, दादाराव खराडे, सुरेश वावगे, उमेश पाटील, गजानन वाघ, रवी पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

-- ताकद वाढविण्याचे आव्हान--

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेची ताकद पाहता पालिकेच्या जिल्ह्यातील ३०१ जागांपैकी ५१ जागा अर्थात १७ टक्केच जागा शिवसेनेच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेचा विचार करता अवघ्या १५ टक्के जागा म्हणजेच ९ जागा त्यांच्याकडे आहेत. पंचायत समितीमध्ये २६ जागा अर्थात एकूण जागांच्या तुलनेत २२ टक्केच जागा शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिराज्य गाजविण्यासाठी शिवसेनेला त्यांची संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.