शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका, जि.प.वर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:39 IST

या वेळी आ. संजय गायकवाड, माजी आ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र ...

या वेळी आ. संजय गायकवाड, माजी आ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर, युवासेना जिल्हाधिकारी ऋषी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे व आशाताई झोरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

खा. जाधव म्हणाले, ज्या पदावर आपण काम करत आहोत, त्या पदाच्या माध्यमातून आपण पक्षासाठी काय दिले याचे आत्मचिंतन करत पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. राज्यातील सत्ताबळाचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांची कामे करीत असताना कार्यकर्त्यांनादेखील त्यांच्या निवडणुकीमध्ये व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रत्येकाने काम करावे. ‘इलेक्टिव मेरीट’ला प्राधान्य देण्याबाबत पक्ष पातळीवर विचार केला जाईल, असेही खा. जाधव म्हणाले.

या वेळी त्यांनी पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांची तयारी आणि एकंदरीत आढावा घेतला; तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक पातळीवर रिक्त व प्रभारी असलेल्या पदांबाबत चर्चा करण्यात आली. आ. गायकवाड यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना उमेदवारांना निवडून आणण्याच्या दृष्टीने जबाबदारी फिक्स करून अधिक जोमाने काम करून नियोजन केले जावे, असे सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व सहसंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनीदेखील याप्रसंगी मार्गदर्शन केले.

या बैठकीस वसंतराव भोजने, भोजराज पाटील, बाबूराव मोरे, तुकाराम काळपांडे, संजय आवताडे, राजू पाटील, शिवाजीराव देशमुख, गजानन धांडे, रामदास चौथनकर, लखन गाडेकर, सुरेश वाळूकर, दादाराव खराडे, सुरेश वावगे, उमेश पाटील, गजानन वाघ, रवी पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

-- ताकद वाढविण्याचे आव्हान--

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेची ताकद पाहता पालिकेच्या जिल्ह्यातील ३०१ जागांपैकी ५१ जागा अर्थात १७ टक्केच जागा शिवसेनेच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेचा विचार करता अवघ्या १५ टक्के जागा म्हणजेच ९ जागा त्यांच्याकडे आहेत. पंचायत समितीमध्ये २६ जागा अर्थात एकूण जागांच्या तुलनेत २२ टक्केच जागा शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिराज्य गाजविण्यासाठी शिवसेनेला त्यांची संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.