शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

तीन हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १३0 शेतकर्‍यांना लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:15 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने यंदा कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात  नुकसान झाले आहे.  त्या धर्तीवर कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचा ‘जी-फॉर्म’ भरून घेतल्या जात आहे. कपाशी  नुकसानीचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जी फार्म भरलेल्या ३ हजार शेतकर्‍यां पैकी केवळ १३0 शेतकरीच या फॉर्ममधील अटींची पूर्तता करू शकले आहेत. त्यामुळे आता  पात्र-अपात्रेच्या निकषात कृषी विभाग नाहक वेठीस धरला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देमलकापूर तालुक्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान 

मनोज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: बोंडअळीच्या प्रादुर्भावाने यंदा कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात  नुकसान झाले आहे.  त्या धर्तीवर कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचा ‘जी-फॉर्म’ भरून घेतल्या जात आहे. कपाशी  नुकसानीचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जी फार्म भरलेल्या ३ हजार शेतकर्‍यां पैकी केवळ १३0 शेतकरीच या फॉर्ममधील अटींची पूर्तता करू शकले आहेत. त्यामुळे आता  पात्र-अपात्रेच्या निकषात कृषी विभाग नाहक वेठीस धरला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुलाबी-शेंदरी बोंडअळीने कापूस उत्पादकांवर संक्रांत आणली आहे. या अळीच्या प्रादुर्भावाने उत् पन्नामध्ये ६५ टक्के घट आणल्याने शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे मलकापूर  तालुक्यातील १९ हजार २२८ हेक्टरवरील कापूस सद्यस्थितीत काळवंडला आहे. ७0 टक्के का पूस पीक अखेरच्या घटका मोजत आहे.  पंचनाम्यादरम्यान एका झाडाच्या ३५ कैर्‍यांपैकी ३0- ३१ तर २८ कैर्‍यांपैकी २४-२५ कैर्‍या बाधित आढळत आहेत. या रोगट झाडांचा इतर पिकांवर  परिणाम होऊ नये व आता कपाशीचे उत्पन्नच मिळणार नसल्याने या पिकात ट्रॅक्टर फिरवण्यावर  शेतकरी भर देऊ लागले आहेत. या जी फॉर्मसोबत बियाणे खरेदी बिल, लेबल व वापरलेले  आवेष्टन साहित्य अर्थात थैली किंवा डबा आदी अटींची पूर्तताही करावी लागत आहेत; मात्र कृषी  विभागाकडे प्राप्त ३ हजार अर्जांपैकी केवळ १३0 अर्जदारच या अटींची पूर्तता करू शकले  आहेत. ही पूर्तता करण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे; मात्र सात-आठ  महिन्यांआधी अथवा पेरणीदरम्यान खरेदी केलेल्या बियाण्यांच्या पावत्या शोधूनही घरात सापडत  नाहीत. अनेकांना तर पेरणीच्या घाईत पावती घेतली की नाही, हेच आठवत नाही. लॉट नंबर काय  असतो, हे माहिती नाही. अशा समस्येने त्रस्त शेतकरी कृषी सेवा केंद्र व कृषी विभागाकडे चकरा  मारताना दिसत आहे. त्यातच या कपाशी नुकसानीस शासन साशंकता कायम आहे. महत्त्वाचे  म्हणजे नुकसान भरपाईसंदर्भात शासनाचे कोणतेही परिपत्रक अद्यापपावेतो जारी झाले नसल्याच्या  बाबीला कृषी विभागानेही दुजोरा दिला आहे. मात्र नुकसानीबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश असल्याचे अधिकारी वर्ग सांगत असल्याने  पुढील काळात पात्र-अपात्रतेच्या फेर्‍यात कृषी विभाग वेठीस धरल्या जाऊ शकतो.