शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १३0 शेतकर्‍यांना लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:15 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने यंदा कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात  नुकसान झाले आहे.  त्या धर्तीवर कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचा ‘जी-फॉर्म’ भरून घेतल्या जात आहे. कपाशी  नुकसानीचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जी फार्म भरलेल्या ३ हजार शेतकर्‍यां पैकी केवळ १३0 शेतकरीच या फॉर्ममधील अटींची पूर्तता करू शकले आहेत. त्यामुळे आता  पात्र-अपात्रेच्या निकषात कृषी विभाग नाहक वेठीस धरला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देमलकापूर तालुक्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान 

मनोज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: बोंडअळीच्या प्रादुर्भावाने यंदा कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात  नुकसान झाले आहे.  त्या धर्तीवर कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचा ‘जी-फॉर्म’ भरून घेतल्या जात आहे. कपाशी  नुकसानीचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जी फार्म भरलेल्या ३ हजार शेतकर्‍यां पैकी केवळ १३0 शेतकरीच या फॉर्ममधील अटींची पूर्तता करू शकले आहेत. त्यामुळे आता  पात्र-अपात्रेच्या निकषात कृषी विभाग नाहक वेठीस धरला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुलाबी-शेंदरी बोंडअळीने कापूस उत्पादकांवर संक्रांत आणली आहे. या अळीच्या प्रादुर्भावाने उत् पन्नामध्ये ६५ टक्के घट आणल्याने शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे मलकापूर  तालुक्यातील १९ हजार २२८ हेक्टरवरील कापूस सद्यस्थितीत काळवंडला आहे. ७0 टक्के का पूस पीक अखेरच्या घटका मोजत आहे.  पंचनाम्यादरम्यान एका झाडाच्या ३५ कैर्‍यांपैकी ३0- ३१ तर २८ कैर्‍यांपैकी २४-२५ कैर्‍या बाधित आढळत आहेत. या रोगट झाडांचा इतर पिकांवर  परिणाम होऊ नये व आता कपाशीचे उत्पन्नच मिळणार नसल्याने या पिकात ट्रॅक्टर फिरवण्यावर  शेतकरी भर देऊ लागले आहेत. या जी फॉर्मसोबत बियाणे खरेदी बिल, लेबल व वापरलेले  आवेष्टन साहित्य अर्थात थैली किंवा डबा आदी अटींची पूर्तताही करावी लागत आहेत; मात्र कृषी  विभागाकडे प्राप्त ३ हजार अर्जांपैकी केवळ १३0 अर्जदारच या अटींची पूर्तता करू शकले  आहेत. ही पूर्तता करण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे; मात्र सात-आठ  महिन्यांआधी अथवा पेरणीदरम्यान खरेदी केलेल्या बियाण्यांच्या पावत्या शोधूनही घरात सापडत  नाहीत. अनेकांना तर पेरणीच्या घाईत पावती घेतली की नाही, हेच आठवत नाही. लॉट नंबर काय  असतो, हे माहिती नाही. अशा समस्येने त्रस्त शेतकरी कृषी सेवा केंद्र व कृषी विभागाकडे चकरा  मारताना दिसत आहे. त्यातच या कपाशी नुकसानीस शासन साशंकता कायम आहे. महत्त्वाचे  म्हणजे नुकसान भरपाईसंदर्भात शासनाचे कोणतेही परिपत्रक अद्यापपावेतो जारी झाले नसल्याच्या  बाबीला कृषी विभागानेही दुजोरा दिला आहे. मात्र नुकसानीबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश असल्याचे अधिकारी वर्ग सांगत असल्याने  पुढील काळात पात्र-अपात्रतेच्या फेर्‍यात कृषी विभाग वेठीस धरल्या जाऊ शकतो.