शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

...अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत धडक देऊ : रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

बुलडाणा : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सरकारने सैन्यभरती घेतली नाही. यामुळे सैन्य दलात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा ...

बुलडाणा : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सरकारने सैन्यभरती घेतली नाही. यामुळे सैन्य दलात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. सैन्यात जाऊ इच्छिणारी शेतकऱ्यांची मुले आहेत. देशसेवेकरिता आसुसलेल्या या मुलांचे भवितव्य सैन्य दलाच्या भरतीवरच अवलंबून आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ७५ हजार जागांकरिता भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर राेजी मोर्चा काढला. सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी; अन्यथा मोर्चा काढून दिल्लीच्या संसद भवनाला घेराव घालू, असा निर्वाणीचा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला.

जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावरून या मोर्चाला प्रारंभ केला. पोलीस स्टेशन, तहसील चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्च्यात विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘वंदेमातरम्’, ‘सैन्य भरती झालीच पाहिजे...’ अशा घोषणांनी शहर दणाणून सोडले. या मोर्च्यात विद्यार्थी चांगलेच आक्रमक होते.

यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, गत दोन वर्षांपासून सैन्य भरती बंद आहे. निमलष्करी दलात १ लाख २७ हजार जागा रिक्त असताना, शासनाने केवळ २५ हजार जागांचीच भरती काढली. किमान ७५ हजार जागांची भरती करण्याची गरज आहे. भरती बंद असल्याने मुलांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. भरतीच्यावेळी दोन वर्षे वयाची मर्यादा वाढवून होतकरू युवकांना संधी द्यावी व त्यांचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणीही तुपकर यांनी यावेळी केली.

दरम्यान, सैन्य भरतीसाठी युवकांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि निमलष्करी दलात ७५ हजार जागांची भरती घेण्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

सैन्यात टाटा, बिर्लांची पोरं नाहीत

युवकांच्या सैन्य भरतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारवर निशाणा साधताना रविकांत तुपकर म्हणाले, भारतीय सैन्यात सीमेवर ही काही टाटा, बिर्ला, अंबानींची पोरं नाहीत. डोळ्यांत तेल घालून तैनात असलेले जवान शेतकरी, कष्टकऱ्यांचीच मुले आहेत. युवकांच्या भवितव्याकरिता, त्यांना देशसेवेची संधी देण्यासाठी भरती घेणे गरजेचे असल्याचे तुपकर म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढणार

अजमेरला भरती झाली, ती कशी झाली? सैन्य दलाशी निगडित रिलेशनशीपची भरती झाली, मग या खुल्या भरतीला काय अडचण आहे, असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला. युवक, विद्यार्थ्यांच्यादृष्टीने ज्वलंत असलेल्या या प्रश्नावर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढणार असल्याचा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला.