शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत धडक देऊ : रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

बुलडाणा : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सरकारने सैन्यभरती घेतली नाही. यामुळे सैन्य दलात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा ...

बुलडाणा : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सरकारने सैन्यभरती घेतली नाही. यामुळे सैन्य दलात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. सैन्यात जाऊ इच्छिणारी शेतकऱ्यांची मुले आहेत. देशसेवेकरिता आसुसलेल्या या मुलांचे भवितव्य सैन्य दलाच्या भरतीवरच अवलंबून आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ७५ हजार जागांकरिता भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर राेजी मोर्चा काढला. सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी; अन्यथा मोर्चा काढून दिल्लीच्या संसद भवनाला घेराव घालू, असा निर्वाणीचा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला.

जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावरून या मोर्चाला प्रारंभ केला. पोलीस स्टेशन, तहसील चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्च्यात विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘वंदेमातरम्’, ‘सैन्य भरती झालीच पाहिजे...’ अशा घोषणांनी शहर दणाणून सोडले. या मोर्च्यात विद्यार्थी चांगलेच आक्रमक होते.

यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, गत दोन वर्षांपासून सैन्य भरती बंद आहे. निमलष्करी दलात १ लाख २७ हजार जागा रिक्त असताना, शासनाने केवळ २५ हजार जागांचीच भरती काढली. किमान ७५ हजार जागांची भरती करण्याची गरज आहे. भरती बंद असल्याने मुलांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. भरतीच्यावेळी दोन वर्षे वयाची मर्यादा वाढवून होतकरू युवकांना संधी द्यावी व त्यांचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणीही तुपकर यांनी यावेळी केली.

दरम्यान, सैन्य भरतीसाठी युवकांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि निमलष्करी दलात ७५ हजार जागांची भरती घेण्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

सैन्यात टाटा, बिर्लांची पोरं नाहीत

युवकांच्या सैन्य भरतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारवर निशाणा साधताना रविकांत तुपकर म्हणाले, भारतीय सैन्यात सीमेवर ही काही टाटा, बिर्ला, अंबानींची पोरं नाहीत. डोळ्यांत तेल घालून तैनात असलेले जवान शेतकरी, कष्टकऱ्यांचीच मुले आहेत. युवकांच्या भवितव्याकरिता, त्यांना देशसेवेची संधी देण्यासाठी भरती घेणे गरजेचे असल्याचे तुपकर म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढणार

अजमेरला भरती झाली, ती कशी झाली? सैन्य दलाशी निगडित रिलेशनशीपची भरती झाली, मग या खुल्या भरतीला काय अडचण आहे, असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला. युवक, विद्यार्थ्यांच्यादृष्टीने ज्वलंत असलेल्या या प्रश्नावर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढणार असल्याचा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला.