शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ई-पासही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 09:58 IST

Buldhana News : खासगी ट्रॅव्हल्सला एकप्रकारे या निर्बंधाच्या काळात मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कठोर निर्बंधांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सद्वारेही प्रवाशांची बिनदिक्कत वाहतूक  होत आहे. प्रवाशांकडे ना ई-पास असते, ना त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारलेले असतात. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सला एकप्रकारे या निर्बंधाच्या काळात मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र आहे.  पोलिसांनी मध्यंतरी चार खासगी वाहनांवर कारवाई केली आहे. बुलडाणा पालिकेनेही १८ मे रोजी दोन ट्रॅव्हल्सला दहा हजार रुपयांचा दंड केला आहे. मात्र, याउपरही बुलडाणा जिल्ह्यातून पुणे, सुरत, मुंबईला खासगी प्रवाशी बसगाड्या धावत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण आहे. सध्या मलकापूर-पुणे, सुरत-मेहकर, जळगाव जामोद-पुणे आणि मलकापूर येथून चार खासगी ट्रॅव्हल्स जिल्ह्याबाहेर जात आहेत. त्यामुळे एकप्रकारे या खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या या प्रसंगी सुपरस्प्रेडरची भूमिका निभावत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

बुलडाण्यातील गाड्या बंदबुलडाणा जिल्हा बस असोसिएशन अंतर्गत बुलडाण्यातून आठ ट्रॅव्हल्स पूर्वी धावत होत्या. मात्र ई-पासची समस्या असल्याने सध्या ट्रॅव्हल्स चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे तूर्तास आमच्या गाड्या आम्ही बंद ठेवल्या असल्याचे बुलडाणा जिल्हा बस असोसिएशनचे पदाधिकारी धनंजय भालेराव यांनी सांगितले. असे असले तरी अन्य ठिकाणांहून ट्रॅव्हल्स धावत आहेत.

प्रवाशांकडेही नसते वैद्यकीय प्रमाणपत्रट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट असतो किंवा त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के असतात. त्यातच ३० प्रवाशांचा शासन टॅक्स घेत असले तरी प्रत्यक्षात १५ प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी दिली जाते. त्यामुळेही बऱ्याचदा अनेक ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी दिसून येत आहेत.

ना मास्क, ना सॅनिटायझरसध्या दररोज ८ ट्रॅव्हल्स सुरत, पुणे, मुंबईसाठी धावत आहेत. यातील प्रवाशांकडे ना मास्क असतो, ना बसचालकांकडे सॅनिटायझर असते. प्रवाशांच्या हातावरही क्वारंटाईनचे शिक्के मारले जात नाहीत. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र तर दूरच आहे. 

ई-पास कोणाकडेही नाही बुलडाणा जिल्ह्यातून जवळपास ८ ट्रॅव्हल्स धावतात. सुरत व पुण्यावरूनही दोन येतात.  या ट्रॅव्हल्सवाल्यांकडे ई-पास नसतो. मुळात बुलडाण्यातून या वाहनांना ई-पासच दिल्या जात नाहीत. मात्र, त्याउपरही या ट्रॅव्हल्स धावत आहेत. कारवाई करण्याची गरज आहे.

पाच ट्रॅव्हल्सवर कारवाईगेल्या आठ ते दहा दिवसांत ५ ट्रॅव्हल्सवर बुलडाणा पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त अमडापूर येथेही एका ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा