शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

डीएडच्या १६६० जागांसाठी केवळ १०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST

संदीप वानखडे बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षक भरतीच हाेत नसल्याने जिल्ह्यातील अध्यापक विद्यालये व महाविद्यालये ओस पडली आहेत. ...

संदीप वानखडे

बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षक भरतीच हाेत नसल्याने जिल्ह्यातील अध्यापक विद्यालये व महाविद्यालये ओस पडली आहेत. डीएलएड (डी. एड.)च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २२ ऑगस्ट हाेती. या मुदतीत केवळ १०० विद्यार्थ्यांनीच अर्ज केला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयांवर विद्यार्थी शाेधण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात १ हजार ६६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्जच आले नसल्याने आता २९ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यात मराठी माध्यमाची एकूण २६ विद्यालये आहेत. तसेच उर्दूमाध्यमाची तीन अध्यापक विद्यालये आहेत. मराठी माध्यमासाठी एकूण १५३० जागा तर उर्दूसाठी १३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी २२ ऑगस्ट शेवटची मुदत हाेती. मात्र, शेवटच्या मुदतीत केवळ १०० च अर्ज आल्याने अनेक अध्यापक विद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. राज्यभरातील हीच स्थिती असल्याने ऑनलाईन अर्ज करण्यास २९ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर कुठलीही मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदने जारी केलेल्या केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

१२वीच्या निकालाचा लाभ नाही

काेराेना संसर्गामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गंत मूल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, बारावीचा निकाल माेठ्या प्रमाणात वाढला आहे़ त्यामुळे, डीएडसाठी विद्यार्थी माेठ्या प्रमाणात अर्ज करतील अशी अपेक्षा हाेती़. मात्र,यावर्षीही विद्यार्थ्यांनी अर्जच केले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, अनेक अध्यापक विद्यालयातील जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे़

शासनाच्या उदासीन धाेरणाचा परिणाम

गेल्या काही वर्षांपासून शिक्षण भरतीविषयी शासनाचे उदासीन धाेरण आहे. शिक्षक भरतीच हाेत नसल्याने विद्यार्थी डीएड आणि बीएडसाठी प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे. शिक्षण हाेण्यासाठी शासनाने पात्रता परीक्षा उत्तीर्णची अट ठेवली आहे. त्यातही टीईटी उत्तीर्ण हाेऊनही शिक्षकाची नाेकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच डीएड, बीएड महाविद्यालयांच्या वाढलेल्या संख्येचा परिणाम झाला आहे़

गेल्या वर्षीही १११९ जागा हाेत्या रिक्त

गेल्या वर्षीही विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली हाेती. मराठी माध्यमाच्या १५३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली असता प्रत्यक्षात ४११ जागांवरच प्रवेश झाले हाेते. तब्बल १११९ जागा रिक्त राहिल्या हाेत्या. यावर्षीही तीच स्थिती असल्याचे चित्र आहे. उर्दू माध्यमाच्या मात्र सर्वच १३० जागांवर प्रवेश झाले हाेते.