शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

डीएडच्या १६६० जागांसाठी केवळ १०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST

संदीप वानखडे बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षक भरतीच हाेत नसल्याने जिल्ह्यातील अध्यापक विद्यालये व महाविद्यालये ओस पडली आहेत. ...

संदीप वानखडे

बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षक भरतीच हाेत नसल्याने जिल्ह्यातील अध्यापक विद्यालये व महाविद्यालये ओस पडली आहेत. डीएलएड (डी. एड.)च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २२ ऑगस्ट हाेती. या मुदतीत केवळ १०० विद्यार्थ्यांनीच अर्ज केला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयांवर विद्यार्थी शाेधण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात १ हजार ६६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्जच आले नसल्याने आता २९ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यात मराठी माध्यमाची एकूण २६ विद्यालये आहेत. तसेच उर्दूमाध्यमाची तीन अध्यापक विद्यालये आहेत. मराठी माध्यमासाठी एकूण १५३० जागा तर उर्दूसाठी १३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी २२ ऑगस्ट शेवटची मुदत हाेती. मात्र, शेवटच्या मुदतीत केवळ १०० च अर्ज आल्याने अनेक अध्यापक विद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. राज्यभरातील हीच स्थिती असल्याने ऑनलाईन अर्ज करण्यास २९ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर कुठलीही मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदने जारी केलेल्या केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

१२वीच्या निकालाचा लाभ नाही

काेराेना संसर्गामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गंत मूल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, बारावीचा निकाल माेठ्या प्रमाणात वाढला आहे़ त्यामुळे, डीएडसाठी विद्यार्थी माेठ्या प्रमाणात अर्ज करतील अशी अपेक्षा हाेती़. मात्र,यावर्षीही विद्यार्थ्यांनी अर्जच केले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, अनेक अध्यापक विद्यालयातील जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे़

शासनाच्या उदासीन धाेरणाचा परिणाम

गेल्या काही वर्षांपासून शिक्षण भरतीविषयी शासनाचे उदासीन धाेरण आहे. शिक्षक भरतीच हाेत नसल्याने विद्यार्थी डीएड आणि बीएडसाठी प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे. शिक्षण हाेण्यासाठी शासनाने पात्रता परीक्षा उत्तीर्णची अट ठेवली आहे. त्यातही टीईटी उत्तीर्ण हाेऊनही शिक्षकाची नाेकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच डीएड, बीएड महाविद्यालयांच्या वाढलेल्या संख्येचा परिणाम झाला आहे़

गेल्या वर्षीही १११९ जागा हाेत्या रिक्त

गेल्या वर्षीही विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली हाेती. मराठी माध्यमाच्या १५३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली असता प्रत्यक्षात ४११ जागांवरच प्रवेश झाले हाेते. तब्बल १११९ जागा रिक्त राहिल्या हाेत्या. यावर्षीही तीच स्थिती असल्याचे चित्र आहे. उर्दू माध्यमाच्या मात्र सर्वच १३० जागांवर प्रवेश झाले हाेते.