खामगाव : ग्रामीण तसेच शहरी भागातील चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शासनाकडून पोषण आहार सुरु करण्यात आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांना दज्रेदार व प्रथिनेयुक्त आहार देण्याचे आदेश अंगणवाड्यांना दिले आहेत. त्यानुसार लाखो रुपये खर्चही शासनाकडून केला जात आहे. परंतु आहार वितरणाचा बट्ट्याबोळ करण्यात आल्याचे ह्यलोकमतह्णने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरुन दिसून आले आहे.संग्रामपूर तालुक्यात बालकांना दिल्या जाणारा शालेय पोषण आहार अंगणवाडीमध्ये न शिजवता अंगणवाडीसेविका व मदतनीस हा आहार घरीच शिजवून आणतात. पोषण आहार घरी शिजवल्यानंतर अंगणवाडीमध्ये आणून वाटप करीत आहेत. त्यामुळे बालकांना ताजा व गरम पुरक पोषण आहार न मिळता थंड आहार वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार ह्यलोकमतह्णने २७ जून रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला आहे.शेगाव तालुक्यात व शहरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प बुलडाणांतर्गत अंगणवाडी केंद्र चालविण्यात येतात. मात्र, या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी राहते. दरम्यान, ही संख्या कागदोपत्री वाढविण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतच्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमध्ये आढळून आले आहे.शेगाव तालुक्यात ११७ आणि मिनी अंगणवाडी ६ अशा एकूण १२३ अंगणवाडी २ जूनपासून सुरू आहेत. तर शहरामध्ये ३0 अंगणवाडी सुरू आहे. यापैकी बहुतांश अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांंंंंंची संख्या कमी आढळून आली. मात्र रेकॉर्डवर ३0 ते ४0 मुलं दाखवल्या जात असल्याचे आढळले. पोषण आहार हा काही ठिकाणी आठ ते दहा दिवसांपासून नसल्याचे सेवकांनी सांगितले.
पोषण आहार वितरणाचा बट्ट्याबोळ!
By admin | Updated: June 28, 2016 01:28 IST