शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

आता शालेय शिक्षणात प्रात्यक्षिकावर भर!

By admin | Updated: June 5, 2014 22:50 IST

विभागात ९ जूनपासून सुरुवात: शिक्षक व गटशिक्षणाधिकारी यांना प्रशिक्षण

अमोल जायभाये / खामगाव शांतिनिकेतनची आठवण यावी, अशा पध्दतीने प्राथमिक शाळांचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. नव्या रचनेनुसार शिक्षण रंजक, नाट्यमय आणि जिवंत होणार असून, त्यादृष्टीने शिक्षण विभाग कामालाही लागला आहे. नव्या पद्धतीचे हे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी आणि चवथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना ते जास्तीत जास्त सोप्या पध्दतीने समजावे, यासाठी सर्वप्रथम ते शिक्षकांना समजणे आवश्यक आहे. पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २0१२ नुसार इयत्ता तिसरी आणि चवथीच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात होणार आहे. हा अभ्यासक्रम ह्यदृष्टिक्षेपात प्रशिक्षणह्ण यावर आधारित आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचना वादावर भर देण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम आधी शिक्षकांना समजणे आवश्यक आहे; तरच ते विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे शिक्षकांनाही याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कला आणि कार्यानुभवाचे शिक्षण घेताना, विद्यार्थ्यांना नाट्यमय स्वरुपात माहिती देण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही नवीन अभ्यासक्रम नीट समजावा, यासाठी प्रात्यक्षिक स्वरुपाच्या शिक्षणावर भर राहणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग जास्तीत जास्त राहणार आहे. यातून मुलांना आनंदायी शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे. नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देताना अभ्यासक्रम- पाठय़पुस्तक समन्वय, माहिती- तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, गटकार्याला भरपूर संधी, अभ्यासक्रम कसा संक्रमित करावयाचा यावर भर, उत्कृष्ट व तज्ज्ञ व्यक्तींची निवड, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयांमध्ये प्रात्यक्षिक व कृतींवर भर, राज्यस्तरीय तज्ज्ञांमार्फत जिल्हास्तरीय साधन व्यक्तींना प्रशिक्षण, वर्ग अध्ययन आणि अध्यापनाचे दिग्दर्शन, स्वाध्याय व स्वअध्ययनावर भर दिला जाणार आहे.