शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

राजकारण करण्याची ही वेळ नाही-रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST

ते स्थानिक पत्रकार भवनमध्ये २३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते़ कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात वाढला ...

ते स्थानिक पत्रकार भवनमध्ये २३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते़ कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात वाढला आहे. ग्रामीण विभागात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही. नागरी भागात आरटीपीसीआरचे रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत. व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हेच कळत नाही, मग त्याच्यावर उपचार कसे करावेत, हा प्रश्नही तुपकर यांनी यावेळी उपस्थित केला. त्यातच तो पॉझिटिव्ह असेल तर विना औषधोपचाराचे चार ते पाच दिवस निघून जातात आणि प्रकृती गंभीर बनून रुग्ण दगावतो, अशी भयावह स्थिती आहे. शहराच्या ठिकाणी तपासणी करायला लोक घाबरतात. ग्रामीण भागात औषधोपचाराची सोय झाल्यास कोरोनाला प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील मोठ्या गावांमध्ये शासनाने दिलेल्या निधीतून शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. कोरोनामुळे सर्वत्र भीषण परिस्थिती उद्भवली आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेत ऑक्जिसन मिळत नाही, म्हणून रुग्ण दगावत आहेत. आरटीपीसीआरसाठी स्वॅब दिल्यानंतर त्याचा रिपोर्टच सहा दिवसांनी येतो. अहवाल कळेपर्यंत रुग्णाची प्रकृती बिघडते. काय करावे, हे सामान्यांना सूचत नाही. संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने ४८ तासांत आरटीपीसीआरचा रिपोर्ट देण्याची व्यवस्था करावी. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात कठाेर पावले उचलण्याची गरज तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार

तहान लागल्यावर प्रशासन विहीर खोदत असल्याचा प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना काही गोष्टी सुचविल्या आहेत. केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हेतर अख्ख्या राज्यात ग्रामीण भागामध्ये मोठ्या ग्रामपंचायतींनी कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये क्वारंटीन सेंटर करावे, पूर्वीचे बंद असलेले केंद्र सुरू करावे, आदी उपाय त्यांनी मांडले.