शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

राजकारण करण्याची ही वेळ नाही-रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST

ते स्थानिक पत्रकार भवनमध्ये २३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते़ कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात वाढला ...

ते स्थानिक पत्रकार भवनमध्ये २३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते़ कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात वाढला आहे. ग्रामीण विभागात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही. नागरी भागात आरटीपीसीआरचे रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत. व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हेच कळत नाही, मग त्याच्यावर उपचार कसे करावेत, हा प्रश्नही तुपकर यांनी यावेळी उपस्थित केला. त्यातच तो पॉझिटिव्ह असेल तर विना औषधोपचाराचे चार ते पाच दिवस निघून जातात आणि प्रकृती गंभीर बनून रुग्ण दगावतो, अशी भयावह स्थिती आहे. शहराच्या ठिकाणी तपासणी करायला लोक घाबरतात. ग्रामीण भागात औषधोपचाराची सोय झाल्यास कोरोनाला प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील मोठ्या गावांमध्ये शासनाने दिलेल्या निधीतून शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. कोरोनामुळे सर्वत्र भीषण परिस्थिती उद्भवली आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेत ऑक्जिसन मिळत नाही, म्हणून रुग्ण दगावत आहेत. आरटीपीसीआरसाठी स्वॅब दिल्यानंतर त्याचा रिपोर्टच सहा दिवसांनी येतो. अहवाल कळेपर्यंत रुग्णाची प्रकृती बिघडते. काय करावे, हे सामान्यांना सूचत नाही. संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने ४८ तासांत आरटीपीसीआरचा रिपोर्ट देण्याची व्यवस्था करावी. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात कठाेर पावले उचलण्याची गरज तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार

तहान लागल्यावर प्रशासन विहीर खोदत असल्याचा प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना काही गोष्टी सुचविल्या आहेत. केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हेतर अख्ख्या राज्यात ग्रामीण भागामध्ये मोठ्या ग्रामपंचायतींनी कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये क्वारंटीन सेंटर करावे, पूर्वीचे बंद असलेले केंद्र सुरू करावे, आदी उपाय त्यांनी मांडले.