शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

राष्ट्रीय स्मारक परिसरात नवीन कार्यक्रमांना पायबंद

By admin | Updated: January 6, 2015 00:20 IST

राष्ट्रीय स्मारक परिसरात नवीन कार्यक्रमांना पायबंद घालण्याचे धोरण स्विकारले आहे.

स्विकारले खामगाव (बुलडाणा): राष्ट्रीय स्मारकांचे जतन करण्याच्या उद्देशातून राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात नव्याने कार्यक्रम सुरू करण्याबाबत पायबंद घालण्याकरिता केंद्र शासनाने धोरण ठरविले आहे. त्यामुळे अशा राष्ट्रीय स्मारक परिसरात नव्याने कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये. तसेच कार्यक्रम घेण्याबाबत जाणीवपूर्वक परिस्थिती निर्माण होत असेल तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी पोलिसांनी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे निर्देश राज्य शासनाच्या गृह विभागाने २ जानेवारी २0१५ रोजी दिले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रायालयाच्या अखत्यारितील येणार्‍या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेकडून देशभरातील राष्ट्रीय स्मारकांची देखभाल करण्यात येते. देशातील अतिमहत्त्वाची अशी एकूण ३६८0 स्मारके आहेत. तर यापैकी ९५५ स्मारकांमध्ये आजही पूजाअर्चा केली जाते. यापैकी ज्या स्मारकांना सुरक्षा प्रदान करण्यात आली असेल व त्या ठिकाणी पुरातन काळापासून कोणताही धार्मिक विधी संपन्न होत नसेल, तर अशा स्मारकांच्या ठिकाणी नव्याने कोणत्याही धार्मिक विधीस मान्यता न देण्याचे केंद्र शासनाने धोरण ठरविले आहे. काही वेळा अशा स्मारकांच्या ठिकाणी जबरदस्तीने पूजा-अर्चा सुरू करण्याचे प्रयत्न केले जातात. अशावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेकडून पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाकडून मदत मागितली जाते. राष्ट्रीय स्मारकांचा ठेवा जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्मारकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेने पोलिसांकडून मदत मागितल्यास, त्यांना पोलीस संरक्षण देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तत्काळ करावी. तसेच अशा राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश गृह विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे राष्ट्रीय स्मारकामध्ये नव्याने कार्यक्रम घेण्यास पायबंद होणार आहे. राष्ट्रीय स्मारकांचे महत्त्व अबाधित राहावे व त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचे अवडंबर निर्माण होऊ नये यासाठीच हे धोरण असल्याचे स्पष्ट होत आहे.