शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST

स्थानिक मातोश्री कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बुलडाणा व मोताळा ...

स्थानिक मातोश्री कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बुलडाणा व मोताळा तालुक्यांत अतिवृष्टीमुळे हे मोठे नुकसान झाले आहे. ५० लाख रुपये खर्च करूनही शेत पूर्ववत होणार नाही, अशी स्थिती आहे. सोबतच नदीचा नाला, नाल्याचा ओढा झाल्यामुळे हे नुकसान होत आहे. पाच टक्क्यांच्या फायद्यासाठी नदीकाठावर शेती करण्यासोबतच विहिरीतील ढिगारा टाकला जात आहे. त्यातून नदीचे पात्र छोटे होऊन नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखुशीने नद्यांच्या रुंदीकरणासाठी नदीकाठची २० ते ३० फूट जमीन दिल्यास भविष्यातील नुकसान टाळता येईल, असे आवाहन त्यांनी केले. बऱ्याच ठिकाणी काहींनी नदीपात्रातच घर, गोठे बांधले आहे. अशा अतिक्रमित जागेत झालेल्या नुकसानीची भरपाईही कायद्यानुसार देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

--शासनाने पाच प्रकारचा सर्व्हे करावा.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करताना एकूण पाच प्रकारे सर्व्हे केला जावा. यात चक्रीवादळामुळे पिकांचे झालेले नुकसान, पावसाचे पाणी शेतात तुंबल्यामुळे पिकांचे झालेले नुकसान, नदीकाठची खरडून गेलेली जमीन, बुजलेल्या विहिरी आणि ऑनलाईन सर्व्हेक्षण त्वरित करणे अपेक्षित आहे. त्या संदर्भाने सूचना दिलेल्या असल्याचे ते म्हणाले. अनुषंगिक विषयान्वये शेतकऱ्यांनी जागरूकता दाखविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

--नद्यांचा डीपीआर तयार केला जावा--

नद्या मानवी कृत्यांमुळे आकुंचन पावल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष नकाशावरील नदीची लांबी, रुंदी व त्या संदर्भातील जुन्या नोंदींचा आधार घेत त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सातत्याने पाच वर्षांत होणाऱ्या नुकसानीमुळे मिळणारी भरपाई पाहता त्याच खर्चात दीर्घकालीन स्वरूपात कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न सुटेल, असे ते म्हणाले.