शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST

स्थानिक मातोश्री कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बुलडाणा व मोताळा ...

स्थानिक मातोश्री कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बुलडाणा व मोताळा तालुक्यांत अतिवृष्टीमुळे हे मोठे नुकसान झाले आहे. ५० लाख रुपये खर्च करूनही शेत पूर्ववत होणार नाही, अशी स्थिती आहे. सोबतच नदीचा नाला, नाल्याचा ओढा झाल्यामुळे हे नुकसान होत आहे. पाच टक्क्यांच्या फायद्यासाठी नदीकाठावर शेती करण्यासोबतच विहिरीतील ढिगारा टाकला जात आहे. त्यातून नदीचे पात्र छोटे होऊन नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखुशीने नद्यांच्या रुंदीकरणासाठी नदीकाठची २० ते ३० फूट जमीन दिल्यास भविष्यातील नुकसान टाळता येईल, असे आवाहन त्यांनी केले. बऱ्याच ठिकाणी काहींनी नदीपात्रातच घर, गोठे बांधले आहे. अशा अतिक्रमित जागेत झालेल्या नुकसानीची भरपाईही कायद्यानुसार देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

--शासनाने पाच प्रकारचा सर्व्हे करावा.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करताना एकूण पाच प्रकारे सर्व्हे केला जावा. यात चक्रीवादळामुळे पिकांचे झालेले नुकसान, पावसाचे पाणी शेतात तुंबल्यामुळे पिकांचे झालेले नुकसान, नदीकाठची खरडून गेलेली जमीन, बुजलेल्या विहिरी आणि ऑनलाईन सर्व्हेक्षण त्वरित करणे अपेक्षित आहे. त्या संदर्भाने सूचना दिलेल्या असल्याचे ते म्हणाले. अनुषंगिक विषयान्वये शेतकऱ्यांनी जागरूकता दाखविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

--नद्यांचा डीपीआर तयार केला जावा--

नद्या मानवी कृत्यांमुळे आकुंचन पावल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष नकाशावरील नदीची लांबी, रुंदी व त्या संदर्भातील जुन्या नोंदींचा आधार घेत त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सातत्याने पाच वर्षांत होणाऱ्या नुकसानीमुळे मिळणारी भरपाई पाहता त्याच खर्चात दीर्घकालीन स्वरूपात कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न सुटेल, असे ते म्हणाले.