शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेने जिल्ह्यात घेतला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:37 IST

बुलडाणा :  देशातील जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गांना  जोडण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेने वेग घेतला असून,  बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १३२  किलोमीटर लांबीच्या  रस्त्यांसाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया ही संयुक्त मोजणी स्तरावर  पोहोचली आहे.

ठळक मुद्देचिखली-धाड-भोकरदन मार्गाला केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा!रस्ते विकास 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  देशातील जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गांना  जोडण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेने वेग घेतला असून,  बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १३२  किलोमीटर लांबीच्या  रस्त्यांसाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया ही संयुक्त मोजणी स्तरावर  पोहोचली आहे.या रस्त्यांची कामे वेगाने होण्यासाठी संयुक्त मोजणी ते निवड स् तरावर या भूसंपादन प्रकरणाचा आता अधिक वेगाने निपटारा  होणे गरजेचे आहे. ५४८ सीसी, ७५३ ई आणि ७५३ एम या  राष्ट्रीय महामार्गासाठी जवळपास ५१.७0 हेक्टर जमीन संपादीत  करणे आवश्यक असून, या प्रक्रियेमुळे एकूण एक हजार ३१६  भूधारक प्रभावित होत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अकोलाच्या अखत्यारीत येत  असलेल्या मंठा-लोणार-चिखली-खामगाव या एनएच-५४८  सीसी मार्गासाठी मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव आणि  बुलडाणा विभागात ३२.५२ हेक्टर जमीन संपादीत करावी  लागणार आहे. यामुळे जवळपास  एक हजार १४२ भूधारक  प्रभावित होत आहे. त्यासंदर्भातील सविस्तर अहवालही  पाठविण्यात आला असून, १९ ऑगस्टलाच तो देण्यात आला  आहे. या जागेच्या भूसंपादनाचीही प्रक्रिया सध्या संयुक्त मोजणी  स्तरावर पोहोचली आहे.दुसरीकडे अकोला विभागाच्याच अखत्यारित येत असलेल्या  अजिंठा-बुलडाणा-खामगाव (एनएच७५३ ई) या  मार्गासाठीचीही भूसंपादन प्रक्रिया सध्या प्रशासकीय पातळीवर  सुरू असून, त्याच्याही संयुक्त मोजणीचे प्रस्ताव पाठविण्यात  आले आहे. येथे अवघी १.५६ हेक्टर जमीन संपादीत करावी  लागणार असून, १५ शेतकरी त्यामुळे बाधित होत आहेत.  अजिंठा-बैतुल मार्गाचा हा भाग आहे.असे असले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या औरंगाबाद  कार्यालयाच्या अखत्यारीत गेलेल्या चिखली-दुधा-धाड- भोकरदन या राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३ एमचा भाग  असलेल्या रस्त्यासाठी मात्र अद्याप केंद्र शासनाने परवानी दिली  नसल्याची माहिती समोर येत आहे. या रस्त्यासाठी १0.६१ हे क्टर जमीन संपादीत करावी लागणार असून, तसा प्रस्तावही  बुलडाणा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात  आला आहे; मात्र केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय हा प्रश्न तू र्तास हाताळणे शक्य नसल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांचेही लक्षमुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनेही रस्ते विभागाचा हा मुद्दा महत्त्वाचा  असून, विभाग स्तरावर घेण्यात येणारा आढावा बैठकीत प्रकर्षाने  त्यांनी रस्ते कामांची माहिती घेतली आहे. त्यानुषंगाने बुलडाणा  जिल्ह्यातील यंत्रणांनीही आपली माहिती अद्ययावत केलेली  आहे. राष्ट्रीय महामार्ग, शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार,  कौशल्य विकास आणि सिंचन प्रश्नांना आढावा बैठकांमध्ये  प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, इटीएस मशीनद्वारे काही  ठिकाणी जमिनीची मोजणी सुरू आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा