शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

नांदुरा-ब-हाणपूर आता राष्ट्रीय महामार्ग!

By admin | Updated: February 4, 2016 01:38 IST

चौपदरीकरणाला मंजुरी; दोन राष्ट्रीय महामार्गांच्या नकाशावर जळगाव.

नानासाहेब कांडलकर/ जळगाव: मुंबई ते कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणारा नांदुरा-जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर या आंतरराज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. ८६ कि.मी. अंतराच्या या रस्त्याच्या चौपदीकरण कामाला मंजुरी मिळाली असून, नोव्हेंबरअखेर प्रत्यक्ष या कामास प्रारंभ होत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी यास दुजोरा दिला असून, या रस्त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने जळगाव जामोद शहर हे मोक्याच्या ठिकाणी येणार आहे. यापूर्वी नांदेड ते बर्‍हाणपूर या रस्त्यालासुद्धा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. नांदेड, हिंगोली, वाशिम, पातूर, बाळापूर, शेगाव, वरवट , संग्रामपूर, जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर असा दोन प्रांतांना जोडणार्‍या या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्याचेसुद्धा चौपदीकरण अपेक्षित आहे. तसेच हैद्राबाद ते नांदेड हा रस्ता यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व मध्य प्रदेश अशा तीन प्रांतांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग जळगाव जामोद शहरातून जात असतानाच आता नांदुरा, जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर या रस्त्यालाही राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने जळगाव जामोद हे शहर आता दोन राष्ट्रीय महामार्गांवर येणार आहे. नांदुरा, जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर या रस्त्याच्या चौपदीकरणाचे भूमिपूजन मागील आठवड्यात जळगाव खान्देश येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडल्याचीही माहिती आ.डॉ. संजय कुटे यांनी दिली. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांमुळे जाणे आणि येणे अंतर सुमारे १५0 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे हैद्राबादकडून इंदोरकडे जाणारी व नागपूर, अमरावतीवरून खंडवा व इंदूरकडे जाणारी सर्व वाहने भविष्यात याच रस्त्याने जाणार असल्याने जळगाव, संग्रामपूर व शेगाव या शहरांसह या तीन तालुक्यांनासुद्धा विशेष महत्त्व प्राप्त होऊन विकासाला व व्यापाराला मोठी गती मिळणार आहे.